Ratnagiri News – गॅस टर्मिनलसाठी एक कुदळ मारली तर आम्ही जिंदाल कंपनीवर कुदळ हाणू, बच्चू कडू यांचा ‘हक्क’यात्रेत इशारा

Ratnagiri News – गॅस टर्मिनलसाठी एक कुदळ मारली तर आम्ही जिंदाल कंपनीवर कुदळ हाणू, बच्चू कडू यांचा ‘हक्क’यात्रेत इशारा

आज मी जयगड परिसरात जाऊन आलो तिथे जिंदाल कंपनीने सर्व पाणी प्रदुषित केले आहे. राख बसलेली आंब्याची पाने मी गोळा केली आहेत. जिंदाल कंपनीने तिथे गॅस टर्मिनल उभारायला एक कुदळ जरी मारली, तर आम्ही जिंदाल कंपनीवर कुदळ हाणू, असा रोखठोक इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला. ते आज (13 ऑक्टोबर 2025) रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात आयोजित हक्कयात्रेतील सभेत बोलत होते.

हक्कयात्रेत बच्चू कडू यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदी आले तेव्हा वाटलं होतं काहीतरी चांगले होईल, मात्र काहीच चांगले झाले नाही. आज कोकणातील आंबा, काजू बागायतदार आणि मच्छीमार संकटात सापडले आहेत. कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला तयार नाही. मासेमारीला कृषीचा दर्जा दिला पण कृषीला कुठे दर्जा आहे? आधी कृषीला दर्जा मिळवून द्या. आधीच हे शेतकरी रडत आहेत त्यात मच्छीमारांना आणून बसवले आता तुम्ही दोघे बसा रडत असे मार्मिक उद्गार बच्चू कडू यांनी काढले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, प्रहार दिव्यांग संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा काजल नाईक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, आंबा बागायतदार संघटनेचे प्रकाश साळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणाला गरीब ठेवायचं षडयंत्र

कोकणी माणूस गरीब आहे त्याला गरीब ठेवायचे षडयंत्र रचले जात आहे. कोकणी माणसाशिवाय मुंबई नाही. मुंबईत तुमचे राज्य पाहिजे. पण या लोकांनी कोकणी माणसाला गरीब ठेवले कारण भांडवलदारांना कमी पगारात मजूर मिळाला पाहिजे. या मुंबई-गोवा महामार्गाने सगळी सरकारं पाहिली मात्र महामार्ग काही पूर्ण होत नाही. रस्त्याचे काम रखडवून तुमच्या जमिनीचे भाव पाडायचे आणि कमी भावात जमिनी खरेदी करायच्या असा हा डाव आहे. तेव्हा पुढची पाच-दहा वर्ष तुमच्या जमिनी विकू नका मग पुढचा काळ आपलाच असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. पुढे बच्चू कडू म्हणाले की, अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा दिव्यांगावर खर्च करायचा असतो. त्याहिशोबाने ३५ हजार कोटी रूपये दिव्यांगावर खर्च केले पाहिजेत पण सरकार १४ हजार कोटी रुपयेच खर्च करते. या विरोधातही आपल्याला लढत रहायचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

सिंधुदुर्गपासून पालघर पर्यंत मी स्वत: पदयात्रा काढणार आहे. कोकणातील आंबा, काजू आणि मच्छीमार यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार आहे. या पदयात्रेत सामंताना भेटू, राणेंना भेटू, छोट्या राणेंना भेटू, त्यापेक्षाही छोट्या राणेंना भेटू असा टोला त्यांनी हाणला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बऱ्याचदा आपण आपल्या शरीराने दिलेल्या संकेतांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. पण वारंवार तशा पद्धतीचे संकेत आपल्याला मिळत असतील तर समजून...
Photo – वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडियाचे ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन
अटी, शर्ती, निकष यांचं जाळं विणण्यात फडणवीस सरकार माहिर, शेतकऱ्यांच्या मदतीतील अटींवरून कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले
आज मी निश्चिंत झोपेन….चकमकीत मारल्या गेलेल्या आरोपी मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार
तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण स्मोकिंग सोडून द्या…, तुर्कीच्या राष्ट्रपतींचा सल्ला अन् मेलोनींच हटके प्रत्यु्त्तर चर्चेत
राहुल गांधी चंदीगडमध्ये; IPS अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट घेत केले सांत्वन