IND Vs WI 2nd Test – चौथ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियाला जिंकण्यासाठी आता फक्त 58 धावांची गरज

IND Vs WI 2nd Test – चौथ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियाला जिंकण्यासाठी आता फक्त 58 धावांची गरज

दिल्ली कसोटीवर टीम इंडियाचे चांगली पकड निर्माण केली असून टीम इंडियाने चौथ्या दिवसाअखेर एक विकेट गमावत 63 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला आता जिंकण्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे. तर वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 9 विकेटची आवश्यकता आहे. सध्या केएल राहुल (25*) आणि साई सुदर्शन (30*) फलंदाजी करत आहेत.

सामन्याचा चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजने आपल्या दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा वेस्ट इंडिजने 2 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा केल्या होत्या. सलामीला आलेल्या जॉन कॅम्पेबल (115), शाई होप (103), रोस्टन चेस (40), जस्टिन ग्रीव्हज (नाबाद 50) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा संघ सर्वगडी बाद 390 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 121 धावांच आव्हान मिळालं.

आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर यशस्वी जयस्वाल (08) स्वस्तात माघारी परतला. परंतु केएल राहुल आणि साई सुदर्शनने संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला आहे. दिवसा अखेर टीम इंडियाने एक विकेट गमावत 63 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला आता सामना आणि मालिका जिंकण्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बऱ्याचदा आपण आपल्या शरीराने दिलेल्या संकेतांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. पण वारंवार तशा पद्धतीचे संकेत आपल्याला मिळत असतील तर समजून...
Photo – वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडियाचे ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन
अटी, शर्ती, निकष यांचं जाळं विणण्यात फडणवीस सरकार माहिर, शेतकऱ्यांच्या मदतीतील अटींवरून कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले
आज मी निश्चिंत झोपेन….चकमकीत मारल्या गेलेल्या आरोपी मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार
तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण स्मोकिंग सोडून द्या…, तुर्कीच्या राष्ट्रपतींचा सल्ला अन् मेलोनींच हटके प्रत्यु्त्तर चर्चेत
राहुल गांधी चंदीगडमध्ये; IPS अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट घेत केले सांत्वन