फराह खान -दीपिकाने एकमेकिंना केले अनफॉलो? फराहने सोडले मौन

फराह खान -दीपिकाने एकमेकिंना केले अनफॉलो? फराहने सोडले मौन

बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शक फराह खान आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या दोघांनी एकमेकींना अनफॉलो केल्याच्या चर्चांना उधाळ आले होते. यांच्यात नेमके झाले तरी काय याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पसरली असनाच आता फराह खानने यावर मौन सोडले आहे.

काही दिवसांपर्वी दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर फऱाहने एका शोमध्ये खिल्ली उडवली होती. त्यानंतर दोघींनी एकमेकिंना अनफॉलो केले आणि त्यानंतर दोघी सगळीकडे चर्चेचा विषय झाल्या. मात्र आता फराह खानने यावर मौन सो़डले आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत फराह म्हणते की, त्या दोघी याआधीही एकमेकींना फॉलो करत नव्हत्या. हॅप्पी न्यू ईअर सिनेमाच्या शुटींग दरम्यान आम्ही दोघींनीही इन्स्टाग्रामवर बोलायचे नाही असे ठरवले होते. त्यापेक्षा आपल्याला बोलायचे असल्यास, थेट मेसेज किंवा फोन करायचा असे आमचे ठरले होते. एवढेच नाही तर आम्ही दोघी वाढदिवसालाही एकमेकींना इन्स्टाग्रामवर शुभेच्छा देत नाही. कारण दीपिकाला ते आवडत नाही. मी 8 तासांवरील टिप्पणी विनोद म्हणून केली नव्हती तर दिलीपला सांगण्यासाठी केली होती की आता तोही 8 तास काम करेल तर प्रत्यक्षात तो फक्त 2 तास काम करतो.

दीपिकासोबतच्या नात्याबाबत सांगताना, फराहने सांगितले की, जेव्हा तिने तिची मुलगी दुआला जन्म दिला तेव्हा दीपिकाला भेटणाऱ्या पहिल्या लोकांपैकी ती एक होती. ती पुढे म्हणाली, कोणत्याही गोष्टीचा वादात रूपांतरित करण्याचा हा नवीन ट्रेंड बंद व्हायला हवा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Digital Depression : डिजिटल क्रांतीमुळे डिप्रेशनचा धोका, हातातला मोबाईल जीवघेणा ठरू शकतो का? Digital Depression : डिजिटल क्रांतीमुळे डिप्रेशनचा धोका, हातातला मोबाईल जीवघेणा ठरू शकतो का?
आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जग एका मोबाईलमध्ये सामावले आहे. इंटरनेट, मोबाईलमुळे जगणं सोपं...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर पाळणा हलला, महिलेने एक-दोन नव्हे… ‘इतक्या’ बाळांना दिला जन्म
वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक