राहुल गांधींच्या आरोपानंतर राजुरात धुरळा; राजुरात जे घडलं तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात घडलं असेल! सुभाष धोटेंचा गंभीर आरोप

राहुल गांधींच्या आरोपानंतर राजुरात धुरळा; राजुरात जे घडलं तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात घडलं असेल! सुभाष धोटेंचा गंभीर आरोप

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार मते वगळल्याचा आरोप केला. त्यानंतर राजुरा चर्चेत आले आहे. इथे काँग्रेसने सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, जवळपास तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगळे हे विजयी झाले. या निवडणुकीत मतदार यादीत शंभर टक्के घोळ झालेला आहे. हा मुद्दा माननीय राहुल गांधी यांनी उचललाय. आणि त्यापूर्वी आम्ही राजुराच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती, असे सुभाष धोटे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात कशी झाली मतचोरी? राहुल गांधीकडून पोलखोल

राजुरा मतदारसंघाच्या निकालानंतर पराभवाचे विश्लेषण करताना सुभाष धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात 18 हजार मते वाढली. एवढी माते कशी वाढली? याचा संशय आल्याने धोटे यांनी निवडणुकीपूर्वी तक्रार केली. त्यावरून सुमारे सहा हजारावर मते आयोगाने वगळली होती. उरलेल्या अकरा हजारांहून अधिक मतांमध्येही बोगस मतदार असल्याचा मोठा आरोप धोटे यांनी केला आहे.

राहुल गांधींनी आरोप करताच केंद्रीय निवडणूक आयोगाचेही लगोलग स्पष्टीकरण, काय दिलं उत्तर? वाचा सविस्तर…

कर्नाटकात काँग्रेसची मते वगळण्यात आली तर, राजुरा येथे भाजपने बोगस मतदार वाढवले, असा आरोप आहे. लगतच्या तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातील नागरिकांना इथे मतदार दाखवण्यात आल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला. जी सहा हजारांवर मते वगळली होती त्याच्यावर काय कारवाई केली, अशी विचारणा आम्ही तहसिलदारांकडे केली होती. ही नावं कोणी दाखल केली होती. आम्ही पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल केला आहे. यानंतर संबंधित पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनाही आम्ही भेटलो. आयोगाकडून डाटा मागवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण निवडणूक आयोगाकडून कुठलाही डाटा पोलिसांना मिळालेला नाही. आणि निवडणूक आयोग जोपर्यंत माहिती देत नाही आम्ही कुठलीही कारवाई करू शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले. राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील बोगस मतदारांचा जो मुद्दा उपस्थित केला, तसाच प्रकार महाराष्ट्रातही घडला असेल. राजुरात जे घडलं तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात घडलं असेल, असा गंभीर आरोप सुभाष धोटे यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Bad Food Combination: पतंजलीने सांगितले असे फूड कॉम्बीनेशन जे आरोग्यास हानिकारक, कोणते हे पदार्थ ? Bad Food Combination: पतंजलीने सांगितले असे फूड कॉम्बीनेशन जे आरोग्यास हानिकारक, कोणते हे पदार्थ ?
हल्ली फिटनेस आणि हेल्थ संदर्भात जागरुकता वाढलेली दिसत आहे. लोक सकस आहार आणि डाएडकडे वळत आहेत. आणि हे गरजेचे आहे...
ओबीसी आरक्षण गेले, आता नातवाला नोकरी लागणार नाही; आजोबांनी जीवन संपवले
हैदराबादला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे विशाखापट्टणममध्ये इमर्जन्सी लँडिंग
Latur News – भरधाव एसटीची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
मिरजोळ्यात नेपाळी महिला चालवत होती वेश्याव्यवसाय, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा
Photo – पुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
जनाची नाही तर मनाची लाज बाळगा आणि कबूल करा… मतचोरीवरून अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाला सुनावलं