निवडणूक आयोगातील माणसंच आम्हाला माहिती देत आहेत; मतचोरी मुद्द्यावर राहुल गांधींचा मोठा दावा

निवडणूक आयोगातील माणसंच आम्हाला माहिती देत आहेत; मतचोरी मुद्द्यावर राहुल गांधींचा मोठा दावा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. निवडणूक आयोग मतदार यादीतून लोकांची नावे वगळत आहे आणि त्यासाठी बनावट मोबाईल नंबर वापरत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.निवडणूक आयोगातील माणसंच आम्हाला माहिती देत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

कर्नाटक सीआयडीने निवडणूक प्रकियेबाबत विचारलेल्या प्रश्नांना आठवड्याभरात उत्तरे द्या, अन्यथा जनतेचा निवडणूक आयोगावरील विश्वास उडून जाईल, असा इशारा देत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला एका आठवड्याचा अल्टीमेटम दिला आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मतचोरीचा मुद्द्यावर निवडणूक आयोगाची पोलखोल केली. निवडणूक आयोग सर्वसामान्य लोकांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे मतदार यादीतून वगळत आहे. यासाठी ते इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरत आहेत. आता निवडणूक आयोगातील अनेक लोक त्यांच्याकडे येत आहेत आणि त्यांच्याकडून मदत मिळत आहे. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळत असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. निवडणूक आयोगातील अनेक लोक माझ्याकडे येत आहेत. आता ही संख्या वाढतच आहे. आतील सर्व माहिती आता बाहेर येत आहे. पूर्वी, आपल्याला कोणतीही मदत मिळाली नव्हती, परंतु आता मला मदत मिळत आहे, असा दावाही त्यांनी केला.

देशातील तरुणांना मतदान चोरी होत आहे, हे समजले तर ते कोणत्याही परिस्थितीत व्होटचोरी सहन करणार नाहीत. व्होटचोरी आपण सर्व काही पुराव्यांसह उघड करणार आहोत. त्याची पायभरणी आपण करत आहोत. देशाची लोकशाही हायजॅक झाली आहे. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त दोघांनाही एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला. ते म्हणाले, कर्नाटक सीआयडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एका आठवड्यात द्या. जर असे केले नाही तर जनतेचा निवडणूक आयोगावरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल. निवडणूक आयुक्तांना या सर्व मत चोरीची माहिती आहे. त्यांना सर्व काही माहित आहे. यानंतरही, ते अशा लोकांना मदत करत आहेत जे लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ORS प्यायल्यामुळे खरचं शरीरातील थकवा कमी होतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत ORS प्यायल्यामुळे खरचं शरीरातील थकवा कमी होतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
उन्हाळ्यात जास्त घाम येतो. जास्त घाम येणे अनेकदा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते. शिवाय, जर उष्माघात झाला तर उलट्या आणि जुलाब...
हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका फेटाळली; रिट याचिका दाखल करण्यास हायकोर्टाची मुभा
Video – शेतकरी पित असलेल्या विषाच्या बाटलीवर बोला! प्रियांका जोशी यांनी भाजप प्रवक्त्यांना सुनावलं
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट ब्लॉक
Latur News – भररस्त्यात कार अडवून तरुणाची चाकूने भोसकून हत्या, महिला गंभीर जखमी
‘वर्षा’वर सोफा आणि डबल बेड मॅट्रेससाठी २०.४७ लाखांचा खर्च! जनतेच्या पैशाची उतमात की वाढलेली महागाई? रोहित पवारांचा सवाल
Ratnagiri News – साखरपा-देवरुख मार्गावर अज्ञातांनी ज्वेलर्स मालकाचे अपहरण करत लूटले, गुन्हा दाखल