पुढील आठवड्यात पावसाचे पुन्हा धुमशान; मुंबई, ठाणे, कोकणासह अनेक भागांत ‘अतिमुसळधार’ कोसळणार

पुढील आठवड्यात पावसाचे पुन्हा धुमशान; मुंबई, ठाणे, कोकणासह अनेक भागांत ‘अतिमुसळधार’ कोसळणार

गणेशोत्सवात जोरदार कोसळलेला पाऊस पुढील आठवडय़ात पुन्हा धुमशान घालणार आहे. 13 ते 18 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ या जिह्यांत अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्र तसेच कोकणातील नद्याकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत सूर्यदर्शन झाले आहे. 13 सप्टेंबरपर्यंत ही परिस्थिती ‘जैसे थे’ राहील. त्यानंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. गणेशोत्सव काळात कोकणात पावसाने धो-धो हजेरी लावली. त्याचप्रमाणे पुढील आठवडय़ात पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे. तसेच मुंबई शहरातील काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. नगर, संभाजीनगर, जालना या भागातदेखील मुसळधार पाऊस पडून नद्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश धरणे आधीच भरली आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाच्या हजेरीत धरण क्षेत्राच्या खालच्या भागांतील नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांची लाहीलाही सुरू

मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी दुपारी अचानक उन्हाची तीव्रता वाढली आणि मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही सुरू झाली. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, सांताक्रुझमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन पारा 32 अंशांच्या घरात गेला. याचवेळी किमान तापमान 24 अंशांवर गेले होते. सायंकाळी मात्र ढगाळ वातावरणाची डोकेदुखी सहन करावी लागली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ आहे सर्वोत्तम, वाचा या पीठाचे फायदे नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ आहे सर्वोत्तम, वाचा या पीठाचे फायदे
आपली त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या धावपळीत आपण त्वचेची काळजी...
चार गोष्टी जीवनात आणा उद्योगपती बना! उद्योगपती आर.जी. शेंडे यांचा मराठी तरुणांना कानमंत्र
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाची एकजूट दिसली, त्यांना फक्त 10 मतं इकडे तिकडे करता आली! – संजय राऊत
वसईत स्कायवॉकखालील फायबर शीट्स तुटून खाली पडल्या, सुदैवाने दुर्घटना टळली
दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 आवळा खाल्ला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल? वाचा
चोराला पकडणाऱ्या पोलिसांचा गौरव; धावत्या बसमधून मोबाईल चोरणाऱ्यावर १५ मिनिटांत झडप
तीन वर्षांनंतर दिसला गं बाई दिसला…डहाणूच्या चंद्रसागर खाडीत चित्रबलाकचे आगमन