T20 World Cup 2026 ची तोडफोड फटकेबाजी ‘या’ तारखेपासून सुरू होणार! फायनलचं ठिकाण अजूनही गुलदस्त्यात

T20 World Cup 2026 ची तोडफोड फटकेबाजी ‘या’ तारखेपासून सुरू होणार! फायनलचं ठिकाण अजूनही गुलदस्त्यात

टी-20 World Cup 2026 हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त आयोजनामध्ये खेळला जाणार आहे. 20 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमवणार असून वर्ल्ड कप जिंकण्यासाठी एकमेकांना कडवी झुंज देणार आहेत. त्यामुळे ICC ने सुद्धा कंबर कसून या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. फेब्रुवारी 2026 ते मार्च दरम्यान वर्ल्ड कपचा तोडफोड कार्यक्रम रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा सुद्धा शिगेला पोहोचली असून आता त्याच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. मात्र अंतिम सामना कोणत्या देशात खेळला जाणार याबाबात अजूनही सस्पेन्स कायम आहे.

ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीला सुरू होणार असून 8 मार्चपर्यंत खेळला जाणार आहे. या कालावधीत हिंदुस्थानात कमीत कमी पाच आणि श्रीलंकेमधील दोन स्टेडियमवर सामने खेळले जाणार आहेत. परंतु याबाबत ICC ने अद्याप वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे कोणते सामने कोणत्या देशात आणि कोणत्या स्टेडियमवर खेळले जाणार हे निश्चित नाही. पुढील काही दिवसांमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान तणावपूर्ण संबंधामुळे अंतिम सामन्याचे ठिकाण बदलू शकते.

टी20 वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत 15 संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, अफगानिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदर्लंड आणि इटली या देशांचा समावेश आहे. उर्वरीत पाच संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. या पाच संघांमधील दोन संघ दक्षिण आफ्रिका पात्रता फेरीतून आणि तीन संघ हे आशिया आणि पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून निवडले जाणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवाभाऊ सोलापूरच्या घटनेवरून अजितदादांवर नाराज, अंजना कृष्णा प्रकरणाचा मागवला अहवाल देवाभाऊ सोलापूरच्या घटनेवरून अजितदादांवर नाराज, अंजना कृष्णा प्रकरणाचा मागवला अहवाल
सोलापूरमध्ये अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दम भरला. या घटनेचा...
प्रज्ञा सिंह यांच्यासह सात जणांच्या सुटकेला आव्हान
 दहिसर टोलनाका आता वर्सोवा पुलासमोर
’शेवग्याच्या शेंगा’ पुन्हा रंगभूमीवर, गजेंद्र अहिरे करणार दिग्दर्शन
साहित्य संघाच्या निवडणुकीत मतचोरीचा आरोप,  ‘ऊर्जा’ आणि ‘डॉ. भालेराव विचार मंच’ पॅनेल आमनेसामने
उरणमधील आगीचा मुंबईतील गॅस पुरवठ्यावर परिणाम, लाखो वाहनचालकांना फटका बसण्याची शक्यता
कांद्याच्या कोसळत्या भावाचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद