’शेवग्याच्या शेंगा’ पुन्हा रंगभूमीवर, गजेंद्र अहिरे करणार दिग्दर्शन

’शेवग्याच्या शेंगा’ पुन्हा रंगभूमीवर, गजेंद्र अहिरे करणार दिग्दर्शन

मागील काही वर्षांमध्ये नवीन नाटकांच्या जोडीला जुनी गाजलेली मराठी नाटके पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. यामध्ये नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आलेल्या जुन्या नाटकांचा मोलाचा वाटा आहे. मराठी रसिकांच्या मनात घर केलेले ’शेवग्याच्या शेंगा’ हे सदाबहार नर्मविनोदी नाटक नवीन संचात पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे. या नवीन संचातील ’शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाची जोरदार तालीम सुरू असुन या महिन्याअखेरीस नाटकाचे प्रयोग सुरू होतील.

लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी 10 एप्रिल 2015 रोजी सर्वप्रथम ’शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणले होते. त्यात स्वाती चिटणीस आणि संजय मोने यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता दहा वर्षांनंतर “मिलाप थिएटर्स’’ या नाटकाची पुर्ननिर्मिती करत आहे. या नाटकाचे लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले असून त्यांनीच पुन्हा नव्याने नाटक दिग्दर्शितही केले आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही एव्हरग्रीन जोडी या नाटकात मुख्य भूमिका साकारणार असून त्यांच्यासोबत नंदिता पाटकर, अपूर्वा गोरे, अंकिता दिप्ती, साकार देसाई हे कलाकारही नाटकात आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष कोमकर हत्या प्रकरण, कुख्यात बंडू आंदेकरसह 8 जणांना अटक आयुष कोमकर हत्या प्रकरण, कुख्यात बंडू आंदेकरसह 8 जणांना अटक
गृहकलहातून तरुणावर पिस्तुलातून  गोळ्यांचा वर्षाव करीत खून करणाऱ्या आंदेकर टोळीच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आंदेकर कुटुंबीय...
‘हे’ पाणी महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही! दररोज या पाण्याच्या सेवनाने चेहऱ्यावर येईल अनोखी चमक
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निलंबित, लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीईओंकडून कारवाई
15 सप्टेंबरपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार, हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा करणे महागणार
‘ऑपरेशन सिंदूर’वेळी 400 वैज्ञानिकांनी 24 तास काम केले, ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती
चंद्रपूरात बीएसएनएल कॉपर केबल चोरीचा 24 तासांत उलगडा; दोन आरोपींना अटक, 44 लाखांचा मुद्देमाल जप्त
यूपीआयचे नियम सोमवारपासून बदलणार, व्यापारी पेमेंटची मर्यादा वाढणार