दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले शिक्षक कुटुंबीयांसह सुखरूप सापडले; नातेवाईकांना दिलासा

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले शिक्षक कुटुंबीयांसह सुखरूप सापडले; नातेवाईकांना दिलासा

गुहागर तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व मुलासह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर गुरुवारी सकाळी ते कुटुंबियांसह माण तालुक्यातील गोंदवले महाराज मठ परिसरात सुखरुप सापडले आहेत. चव्हाण कुटुंब दर्शनासाठी गोंदवले येथे आल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांनी त्यांना ओळखताच संबंधित अधिकाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साझल्यानंतर ते सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

चव्हाण कुटुंब गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे गेले होते. मात्र, 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चिपळूण परिसरात त्यांचा अचानक संपर्क तुटला होता. मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. त्यामुळे नातेवाईक चिंतेत होते, त्यामुळे त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गुरुवारी सकाळी ते आणि कुटुंबि. सुखरुप असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईक, सहकारी शिक्षक व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. प्रशासनानेही ते सुखरूप असल्याची पुष्टी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल
नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, सुप्रिया सुळे यांची टीका
काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानात आगीची शंका, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
Sindhudurg News – जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यावर दगड मारला, वडील आणि भावावर कोयता उगारला
रत्नागिरी तिहेरी हत्याकांड प्रकरण, दुर्वास पाटीलसह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले
छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा