भयमुक्त नाशिकसाठी शिवसेना, मनसेचा उद्या संयुक्त जनआक्रोश मोर्चा

भयमुक्त नाशिकसाठी शिवसेना, मनसेचा उद्या संयुक्त जनआक्रोश मोर्चा

महायुती सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे नाशिक जिह्यात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी शिवसेना, मनसे जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त जनआक्रोश मोर्चा काआहे, अशी माहिती दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

हनीट्रपमध्ये आजी-माजी मंत्र्यांवर कारवाई टाळून शासनाने फसवणूक केली. शहरात एमडी ड्रग्ज, अंमली पदार्थ, ऑनलाईन जुगार असे अनेक अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. हत्या, बलात्कार यामुळे जनता भयभीत झाली आहे. जनतेच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा कायात येत असून यात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, सलीम शेख यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या शरीरासाठी कोणती डाळ खाणे चांगले आहे हे जाणून घ्या आपल्या शरीरासाठी कोणती डाळ खाणे चांगले आहे हे जाणून घ्या
शाकाहारी लोकांसाठी, डाळ आणि त्यांच्या शेंगा प्रथिने आणि फायबरचा मुख्य स्रोत आहेत. शाकाहारी लोक दैनंदिन जेवणात डाळ खाणे पसंत करतात....
पती, पत्नी और वो…पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचला…पण अघटित घडले…
वर्धा नदीची पाणीपातळी वाढल्याने गडचांदूर-भोयेगाव मार्ग बंद; इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले
Beed news – वडिलांनी जीवन संपवल्यानंतर बेपत्ता झालेली 4 वर्षाची चिमुकली गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली
104 वर्षांचा इतिहास असणारी राजापूर अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात; कर्ज घेतलेले नसतानाही आल्या नोटीसा, अनेकांच्या तक्रारी
तूप की तेल? आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय, जाणून घ्या
Jolly LLB 2 मधून अर्शदला का वगळले…; अभिनेत्याने थेट दिग्दर्शकाला दिला दोष, सांगितले कारण