मुंबईत लोक कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात, तर मराठी माणसाला त्यांच्या राजधानीत आंदोलनाचा अधिकार! – संजय राऊत
मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी येत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती, त्यानंतर पुन्हा सरकार आलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय संयमाने, सहानुभूतीने आणि शब्दाला जागून पूर्ण करावा. मुंबई ही मराठी माणसांची आहे. मराठी माणसांना मुंबईत येण्यापासून थांबवू नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देते, तर मराठी माणसाला त्यांच्या राजधानीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मराठी माणूस त्यांच्या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणे आणि ऐन गणपतीत मुंबईची कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List