नागपुरात वीज पडून मायलेकासह तिघे ठार; वडिलांनंतर आईचे छत्र हरवले, कुटुबांत सुलगी एकटी उरली

नागपुरात वीज पडून मायलेकासह तिघे ठार; वडिलांनंतर आईचे छत्र हरवले, कुटुबांत सुलगी एकटी उरली

उपराजधानी नागपुरात पावसाच्या दमदार हजेरीने पाणीच पाणी झाले आहे. यादरम्यान कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा शिवारात शेतात काम करत असलेल्या तिघांवर काळाने घाला। घातला. वीज कोसळून माय-लेकासह एक महिला मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली.

आई वंदना प्रकाश पाटील (४२), मुलगा ओम प्रकाश पाटील (१८) व शेतमजूर निर्मला रामचंद्र पराते (६०) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत धापेवाडा येथील शेतकरी प्रकाश पाटील यांच्या पाच एकर शेतीत कपाशीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी चांगल्या पावसामुळे पीक बहरले होते. कपाशीला रासायनिक खत देण्यासाठी मृतक वंदना पाटील व त्यांचा मुलगा ओम आणि इतर पाच मजूर सकाळपासून शेतात काम करीत होते. दुपारी अचानक जोराच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर तिघांच्या अंगावर वीज कोसळली. कळमेश्वर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

१५ वर्षीय मुलगी झाली एकाकी

या घटनेमुळे पाटील कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दोन वर्षांपूर्वी वंदना पाटील यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर वंदना आणि मुलगा ओम शेतीत राबून घर चालवित होते. १५ वर्षांची मुलगी पिहू हिचे शिक्षण सुरू असून, दुर्देवी घटनेने आई आणि मुलगा दोघेही गेल्याने पिहू एकाकी झाल्याने अंतामुळे धापेवाडावासीयांत हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या शरीरासाठी कोणती डाळ खाणे चांगले आहे हे जाणून घ्या आपल्या शरीरासाठी कोणती डाळ खाणे चांगले आहे हे जाणून घ्या
शाकाहारी लोकांसाठी, डाळ आणि त्यांच्या शेंगा प्रथिने आणि फायबरचा मुख्य स्रोत आहेत. शाकाहारी लोक दैनंदिन जेवणात डाळ खाणे पसंत करतात....
पती, पत्नी और वो…पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचला…पण अघटित घडले…
वर्धा नदीची पाणीपातळी वाढल्याने गडचांदूर-भोयेगाव मार्ग बंद; इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले
Beed news – वडिलांनी जीवन संपवल्यानंतर बेपत्ता झालेली 4 वर्षाची चिमुकली गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली
104 वर्षांचा इतिहास असणारी राजापूर अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात; कर्ज घेतलेले नसतानाही आल्या नोटीसा, अनेकांच्या तक्रारी
तूप की तेल? आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय, जाणून घ्या
Jolly LLB 2 मधून अर्शदला का वगळले…; अभिनेत्याने थेट दिग्दर्शकाला दिला दोष, सांगितले कारण