पेणच्या 45 हजार बाप्पांची परदेशवारी, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट मागणी

पेणच्या 45 हजार बाप्पांची परदेशवारी, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट मागणी

गणरायाच्या मूर्तीसाठी फक्त मुंबईसह देशातच नाही तर जगात प्रसिद्ध असलेल्या पेणमधून यंदा 45 हजार बाप्पांची परदेशवारी झाली आहे. गेल्या वर्षी पेणमधून 26 हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या होत्या. यंदाही ही संख्या दुपटीने वाढली आहे. पेणमधील मूर्ती प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि थायलंड आदी देशांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव हा पूर्वी महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. मात्र आता हा सण देशविदेशात साजरा करण्यात येत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले हिंदुस्थानी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करीत आहेत. यावर्षी सुमारे 45 हजार गणेशभक्तांनी पेणच्या गणपती मूर्ती कारखानदारांकडे मूर्तीची मागणी केली होती. त्यानुसार येथील कारखानदारांनी 45 हजारांहून अधिक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या आहेत. ही मूर्ती पाठवण्याची प्रक्रिया मार्च महिन्यात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली आहे. जगभरातून बाप्पांच्या मूर्तीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे असे श्रीकांत देवधर यांनी सांगितले.

दोन फुटांच्या मूर्तीना अधिक पसंती
परदेशात मागविण्यात आलेल्या मूर्तीपैकी 60 टक्के मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत आहेत, तर उर्वरित मूर्ती त्याहून अधिक उंचीच्या आहेत. या मूर्तीमध्ये सिंहासनावर विराजमान गणपती मूर्ती, दगडूशेठ हलवाई, बालगणेश या मूर्तीना मागणी आहे. गणपती मूर्तीना कापडी फेटा, कापडी धोतर, शेला यासह डायमंड, इमिटेशन ज्वेलरीने सजविण्यात आले आहे.

महिला बचत गटांनी तयार केल्या दीड लाख मूर्ती
ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पेण तालुक्यातील विविध बचत गटातील 228 महिला या गणेशमूर्तीच्या व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. महिला बचत गटांनी 1 लाख 56 हजार 20 गणपती मूर्ती तयार केल्या असून यामधील 1 हजार 500  गणपती मूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले! 125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले!
Baba Ramdev Patanjali : भारताला आयुर्वेदाचा समृद्ध असा वारसा आहे. पूर्वी औषधी वनस्पतींच्या मदतीने रुग्णावर उपचार केले जाचे. तसेच आरोग्य...
Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, ‘या’ गंभीर समस्यांवर रामबाण उपाय
पीठ मळल्यानंतर किती तासात खराब होतं? तुम्हीही करतायत का दुर्लक्ष?
ICC ODI Ranking – गोलंदाजांमध्ये जोफ्रा आर्चरची जोरदार मुसंडी; फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल पाचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा कायम
तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन रद्द, शासकीय खुर्चीत बसून गायले होते गाणे
शेजारील देशांमध्ये काय चाललेय पहा! सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला टोला; नेपाळ, बांगलादेशचा उल्लेख
Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडप्रकरणी दुर्वास पाटीलच्या वडिलांना अटक