पीठ मळल्यानंतर किती तासात खराब होतं? तुम्हीही करतायत का दुर्लक्ष?

पीठ मळल्यानंतर किती तासात खराब होतं? तुम्हीही करतायत का दुर्लक्ष?

प्रत्येक घरात चपाती किंवा रोटी बनवण्यासाठी पीठ हे मळलंच जातं. पण कधी कधी वेळेअभावीच काही महिला पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की हे पीठ किती दिवस ताजे राहू शकते? किंवा चुकीच्या पद्धतीने साठवले तर ते किती लवकर खराब होऊ शकते? मग ते मळून ठेवलेलं पीठ असो किंवा कोरडे. पीठाचा ताजेपणा केवळ अन्नाच्या चवीवरच परिणाम करत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यावर देखील परिणाम करतो. त्यामुळे जाणून घेऊयात की पीठ किती तासात खराब होतं?

पीठ कसं साठवायचं?

पीठ हा ओलावा आणि उष्णतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुम्ही ते जास्त वेळ भांड्यात न झाकता तसंच ठेवलं किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं तर त्यावर बुरशी, कीटक येऊ शकतात. त्यामुळे पीठ नेहमी हवाबंद डब्यात आणि थंड, तसेच कोरड्या जागी ठेवावं.

पीठ खराब होण्यास किती वेळ लागतो?

सामान्य गव्हाचे पीठ : उघडे ठेवल्यास 1 ते 2 आठवड्यात खराब होऊ लागते.

मिश्र पीठ (मैदा + गहू + कोंडा)  : 2 ते 3 आठवडे ताजे राहू शकते.

मळलेलं पीठ : मळलेलं पीठ हे फ्रिजमध्ये ठेवलं तर ते 5 ते 6 तासांच्या आत वापरणे योग्य. तर मळल्यानंतर पीठ खोलीच्या तापमानात 2 ते 3 तासच सुरक्षित राहू शकते.

बॅक्टेरिया वेगाने पसरतात: उन्हाळा आणि पावसाळ्यात त्याचे शेल्फ लाइफ आणखी कमी होते, कारण ओलावा आणि बॅक्टेरिया वेगाने पसरतात.

खराब पीठ कसे ओळखावे?

फक्त रंग पाहून पीठ खराब आहे की नाही हे ठरवता येत नाही. त्याची ही लक्षणे ओळखा, जसं की…

विचित्र किंवा आंबट वास.
लहान कीटक किंवा बुरशी दिसणे.
चवीत बदल.
पीठ चिकट किंवा गुठळ्यासारखे दिसणे

जर यापैकी कोणतीही चिन्हे दिसली तर पीठ ताबडतोब फेकून द्या

1.पीठ जास्त वेळ ताजे कसे ठेवण्याचे

2.जुने पीठ संपल्याशिवाय किंवा संपत आल्याशिवाय नवीन पीठ खरेदी करून नका अन्यथा कोरडे पीठही खराब होऊ शकते.

3.ओल्या हातांनी किंवा भांड्यांनी कधीही पीठाला स्पर्श करू नका.

4.उन्हाळ्यात पीठ फ्रिजमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवा.

5.तुम्हाला शक्य असल्यास किंवा तुम्हाला चव आवडत असल्यास तुम्ही पीठ हलके भाजूनही घेऊ शकता

खराब झालेल्या पीठाची रोटी किंवा चपाती खाल्ल्याने आरोग्यावर होणारे परिणाम

खराब पिठापासून बनवलेल्या रोट्या किंवा पराठे खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि अन्नातून विषबाधा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. म्हणूनच पिठाच्या ताजेपणाबद्दल निष्काळजी राहू नये

मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्याने काय होते?

काही लोकांना असे वाटते की पीठ मायक्रोवेव्हमध्ये ठेवून त्याचे शेल्फ लाइफ वाढवता येते, परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की असे केल्याने पीठातील ओलावा आणखी वाढतो, ज्यामुळे ते लवकर खराब होऊ शकते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs UAE – ‘सूर्या’च्या सेनेची धडक, UAE च्या बत्त्या गूल; टीम इंडियाचा विजयी श्री गणेशा IND Vs UAE – ‘सूर्या’च्या सेनेची धडक, UAE च्या बत्त्या गूल; टीम इंडियाचा विजयी श्री गणेशा
Asia Cup 2025 ची टीम इंडियाने अगदी रुबाबात सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलल्या UAE विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 9...
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आणखी एका आरोपीला जामीन; हायकोर्टाचा सरकारी पक्षाला दणका
बावनकुळेंनी दिलेल्या पुराव्यांवरुनच रोहित पवारांनी केली भाजपची पोलखोल, मेघा इंजिनियरींगवरून भाजपला फटकारले
IND Vs UAE – 15 सामने आणि 225 दिवसांची प्रतिक्षा अखेर संपलीच, सूर्यकुमार यादवने करून दाखवलं
Ratnagiri News – कोकण कृषी विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत अनियमितता; महाविकास आघाडीचा आंदोनाचा इशारा
Palghar News – डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय
Photo – थरारक! दशावतार चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांचे लूक पाहून व्हाल थक्क