उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबवा, समन्वय समितीचे आवाहन
मुंबईमधील मंडळांनी गणेशोत्सवात राजकारण न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच सुरक्षेसाठी मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही लावावेत, असे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांना केले आहे.
गणेशोत्सवात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करा. मंडप परिसरात डास निर्मूलन करण्यासाठी धूम्रफवारणी करावी. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता मदत कक्ष, हरवले-सापडे कक्ष, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी व्यवस्था करावी, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे. गणेशोत्सवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे, मात्र गणेशोत्सवाला राजकारणापासून दूर ठेवून भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करावा, असे आवाहनही समितीने केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List