उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबवा, समन्वय समितीचे आवाहन

उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबवा, समन्वय समितीचे आवाहन

मुंबईमधील मंडळांनी गणेशोत्सवात राजकारण न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच सुरक्षेसाठी मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही लावावेत, असे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांना केले आहे.

गणेशोत्सवात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करा. मंडप परिसरात डास निर्मूलन करण्यासाठी धूम्रफवारणी करावी. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता मदत कक्ष, हरवले-सापडे कक्ष, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी व्यवस्था करावी, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे. गणेशोत्सवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे, मात्र गणेशोत्सवाला राजकारणापासून दूर ठेवून भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करावा, असे आवाहनही समितीने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Breaking News – शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी Breaking News – शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी
शिवसेनेकडून दरवर्षी मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येत शिवसैनिकांसह अनेकजण विचारांचे सोने लुटण्यासाठी येतात....
नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध निदर्शने, आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले
…तर राहुल गांधी म्हणतात तसेच पुन्हा वोटचोरीच झाली ना! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
त्यानं नर्तिकेवर जीव ओवाळून टाकला, ती मात्र संपर्कात राहिना; बीडच्या माजी उपसरपंचानं स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवलं
कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, राज ठाकरे यांची भेट घेतली
दररोज नाश्त्यात एक वाटी भिजवलेले चणे खाण्याचे शरीराला काय फायदे मिळतील, वाचा