हायकोर्टाच्या नवनिर्वाचित तीन न्यायमूर्तींनी घेतली शपथ

हायकोर्टाच्या नवनिर्वाचित तीन न्यायमूर्तींनी घेतली शपथ

मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांचा शपथविधी सोहळा आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात पार पडला. या समारंभात नवनिर्वाचित न्यायमूर्तींनी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या उपस्थितीत गोपनीयतेची शपथ घेतली त्यामुळे उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 69 झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांची 28 जुलै रोजी शिफारस केली होती. त्यावर गेल्या आठवडयात केंद्र सरकारने नियुक्ती बाबत अधिसूचना काढली. अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांचा शपथविधी सोहळा आज हायकोर्टात आयोजित करण्यात आला होता. नवनिर्वाचित न्यायमूर्तींच्या शपथविधी नंतर उच्च न्यायालयात आता  69 न्यायमूर्ती झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई
राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फ सौंदळ येथे सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत एका कंटेनरमधील...
तेलंगणातील विद्यार्थ्यांचा ब्रिटनमध्ये अपघाती मृत्यू; गणेश विसर्जन करून घरी परतत असताना काळाचा घाला
Ratnagiri News – अंमली पदार्थाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे निर्देश
खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?
ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
आयुर्वेदाकडे आहे UTI आणि ॲनीमियावर उपचार ? पतंजलीचे संशोधन काय म्हणते ?
ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ