42 वर्षांनंतर स्वप्नपूर्ती; कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण

42 वर्षांनंतर स्वप्नपूर्ती; कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ प्रदीर्घ लोकलढय़ाची आज स्वप्नपूर्ती झाली. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण आज सायंकाळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेच्या अनावरणाने मोठय़ा दिमाखात झाले.

संस्थानकाळापासून सुरू असलेल्या सीपीआर रुग्णालयासमोरील न्यायालयीन हेरिटेज वास्तूमध्ये या सर्किट बेंचची सुरुवात झाली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आदी उपस्थित होते.  उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीश  गवई हे न्यायालयाच्या प्रांगणात येताच त्यांना पोलीस दलाच्या वतीने ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. सर्किट बेंचचे उद्घाटन करून इमारत परिसराची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल सरन्यायाधीश गवई यांनी कौतुक केले.

काय ती झाडी, काय तो डोंगरफलकबाजीवरून चिमटे

दीड वर्षांपूर्वी आपण कोल्हापुरात आलो असता, येथील वकिलांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटले. त्यांच्या झालेल्या चर्चेवरून त्यावेळीकाय ते डोंगरकाय ती झाडी…. काय हॉटेल…’, असे डेंजर भाषण वकील विवेक घाटगे यांनी केल्याची आठवण करून देताना, सर्किट बेंचच्या निमित्ताने श्रेयवादासाठी लागलेल्या फलकबाजीत आपलेही पह्टो लावल्याचे निदर्शनास आणून देत सरन्यायाधीश गवई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मिश्किल चिमटे काढले.

न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे

‘कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे आपण लवकरच खंडपीठात रूपांतर करणार आहोत. न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे, या मताचे आपण आहोत’ असे सांगतानाच, ‘संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण सर्वोच्च पदावर पोहोचलो आहोत. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी राहिले. त्यामुळे कोल्हापुरातील या सर्किट बेंचच्या माध्यमातून त्यांच्या उपकारांची उतराई म्हणून आपला हा खारीचा वाटा आहे. सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च पदावर बसताना जो आनंद झाला, तोच आनंद कोल्हापूर सर्किट बेंचच्या निमित्ताने झाल्याची कृतज्ञतापूर्वक भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई
राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फ सौंदळ येथे सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत एका कंटेनरमधील...
तेलंगणातील विद्यार्थ्यांचा ब्रिटनमध्ये अपघाती मृत्यू; गणेश विसर्जन करून घरी परतत असताना काळाचा घाला
Ratnagiri News – अंमली पदार्थाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे निर्देश
खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?
ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
आयुर्वेदाकडे आहे UTI आणि ॲनीमियावर उपचार ? पतंजलीचे संशोधन काय म्हणते ?
ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ