प्रत्येक शुभ कार्यापूर्वी आपण दही आणि साखर का खातो? आहे खास कारण

प्रत्येक शुभ कार्यापूर्वी आपण दही आणि साखर का खातो? आहे खास कारण

भारतीय परंपरांमध्ये अशा अनेक प्रथा आहेत ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. त्या प्रथा आजही आपण मानतो. त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी हातावर दही आणि साखर घेणे किंवा एखाद्या व्यक्तिच्या हातावर दही-साखर ठेवून त्याला ते खायला देणे.

लहानपणापासून आपण सर्वांनी पाहिले आहे की आपल्याला परीक्षेला जायचे असलं किंवा मग मुलाखतीला जायचे असलं किंवा कोणतही शुभ कार्य असेल तर, तेव्हा घरातील वडीलधारी लोक आपल्या हातावर दही आणि साखर ठेवायची. ही प्रथा शुभ असते एवढंच सांगितलं जातं. पण खरंच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दही-साखर का खायला देतात कधी विचार केला का? चला जाणून घेऊयात काय कारण आहे ते.

शुभ कार्याच्या सुरुवातीला दही साखर खायला  का देतात?

दही आणि साखर खाणे हे केवळ परंपरेशी संबंधित नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. म्हणूनच लोक प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला दही साखर खायला देतात. आजही ही परंपरा प्रत्येक घरात पाळली जाते.

अध्यात्म काय सांगतं?

दह्याला पंचामृत मानलं जातं, त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात त्याचा आवर्जून वापर करतात. ज्योतिषशास्त्रात दह्याचा संबंध चंद्राशी असल्याचं सांगितलंय. दह्याचा रंग पांढरा असल्यामुळे चंद्राला ते प्रचंड आवडतं. म्हणूनच ग्रहणात अनेक भागात दह्याचे पदार्थ बनवले जातात. किंवा दही साखर दिलं जातं.

आरोग्याच्या दृष्टीने दही साखर खाण्याचे काय फायदे आहेत

त्वरित ऊर्जा प्रदान करते

दही आणि साखर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हे खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, कारण आपल्याला साखरेतून ग्लुकोज आणि दह्यापासून प्रथिने मिळतात . घराबाहेर पडण्यापूर्वी हे खाल्ल्याने तुम्ही दिवसभराच्या कामासाठी तयार होता. तुम्हाला उर्जेची कमतरता भासत नाही.

पचनक्रिया व्यवस्थित राहते

दह्यामध्ये अनेक चांगले बॅक्टेरिया आढळतात जे आपले पोट आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करतात. यामुळे पोट खराब होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः जेव्हा तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.

शरीर हायड्रेटेड राहते

घराबाहेर पडताना तुम्हाला दही आणि साखर दिली जाते कारण ते तुमचे शरीर हायड्रेट ठेवते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते. याशिवाय, तुम्ही सक्रिय राहता.

उष्णतेपासून रक्षण होते

सुरुवातीपासूनच आपल्या सर्वांना सांगण्यात आले आहे की उन्हाळ्यात दही खाल्ल्याने आपले शरीर थंड होते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी दही आणि साखर खाणे म्हणजे उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. अशा परिस्थितीत, बाहेर गेल्यावर आजारी पडण्याची शक्यता देखील कमी होते.

ताण कमी होतो

काही कामासाठी बाहेर गेल्यावर अनेक लोक तणावात येतात. विशेषतः जेव्हा त्यांना परीक्षा किंवा मुलाखत द्यायची असते. अशा परिस्थितीत दही आणि साखर खाल्ल्याने मन शांत होते. त्याची गोड चव मनाला शांत करते. त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो.

शुभ मानले जाते

दही आणि साखर खाणे हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या संस्कृतीतही शुभ मानले जाते. घराबाहेर पडण्यापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्यास सर्व काम व्यवस्थित होते असे म्हटले जाते.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;