आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केले की, भाजप थयथयाट का करतो? आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केले की, भाजप थयथयाट का करतो? आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

‘मतचोरी हा जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीतील सर्वात मोठा गुन्हा आहे. ही चोरी झाली आहे आणि ती पकडली गेली आहे. आता आयोगाने राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी. स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करावा, नाहीतर चूक मान्य करावी,’ अशी सडेतोड भूमिका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मांडली.

‘सीएनएन न्यूज 18’च्या टाऊन हॉल या चर्चासत्रात ते बोलत होते. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, ‘निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे. मागच्या 7-8 वर्षात देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्याच नाहीत. आयोगाने होऊ दिल्या नाहीत. सगळे वाढीव आणि बनावट मतदान भाजपला गेले, असा दावा त्यांनी केला. ‘आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केले की, भाजप थयथयाट का करतो?,’ असा सवालही त्यांनी केला.

भाजपला महाराष्ट्राबद्दल आत्मीयता नाही

‘मुंबईतील अनेक विकासकामे आमच्या काळात सुरू झाली. कोस्टल रोडचा प्रकल्प आम्ही सुरू केला. भाजप-मिंधेंच्या काळात ही सगळी कामे रखडली. कामांची गुणवत्ता खराब झाली हे आदित्य ठाकरे यांनी उदाहरणांसह सांगितले. अलीकडच्या हिंदीसक्तीवरही त्यांनी भाष्य केले. ‘महाराष्ट्राने बाहेरच्या राज्यांतील लोकांचे नेहमी स्वागतच केले आहे. आम्ही कोणत्याही भाषेविरोधात नाही. मात्र कोणी आमच्यावर काही लादू नये इतकेच म्हणणे आहे. भाजपने ते करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद झाला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

चीनचा पाकला पाठिंबा तरी मोदी चीनला जातात…

पहलगाम हल्ला हा पेंद्र सरकारचे सपशेल अपयश आहे, पण ते मान्य केले जात नाही. सैन्याचे प्रमुख सांगतात की, चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे, तरी आपले पंतप्रधान चीनला का जातात? बीसीसीआय पाकिस्तानशी क्रिकेट का खेळते? बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तरीही बीसीसीआय त्यांना खेळण्यासाठी आमंत्रण देते, असा सवाल त्यांनी केला.

नवाझ शरीफचा केक कापणे ही खरी विचारधारेशी तडजोड

काँग्रेसशी आघाडी करून शिवसेनेने हिंदुत्व सोडले या भाजपच्या टीकेचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. आमच्यावर आरोप करणाऱयांनी काय केले? नवाझ शरीफच्या वाढदिवसाचा केक कापणे, पीडीपीसोबत युती करणे, पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे ही खरी विचारधारेपासूनची फारकत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला हाणला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल