मौऺथा वादळाचा तडाखा, महाराष्ट्रातील सात मच्छीमार बोटी पाच दिवसांपासून बेपत्ता

मौऺथा वादळाचा तडाखा, महाराष्ट्रातील सात मच्छीमार बोटी पाच दिवसांपासून बेपत्ता

अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून उठलेल्या मौऺथा वादळ आणि मुसळधार पाऊस या तडाख्यात पाच मच्छीमार बोटी बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. श्री साई समर्थ कृपा, चंद्राई, गावदेवी मरीन आणि माहुलच्या बोटी बेपत्ता आहेत. कोस्टगार्डच्या मदतीने या बोटींचा शोध घेण्याचे काम सुरू असले तरी अद्यापि त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे खलाशांच्या कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरण खराब झाले आहे. तसेच वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान विभागाने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर शनिवारपासून मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र वादळाच्या इशाऱ्यापूर्वीच शेकडो मच्छीमार बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या आहेत. अनेक मच्छीमार बोटींनी विविध बंदरातील किनारा गाठला असला तरी काही मच्छीमार बोटी अद्यापही वादळात अडकून पडलेल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल