सरसंघचालक मोहन भागवत यांची दिल्लीत 50 मुस्लिम धर्मगुरुंसोबत महत्त्वाची बैठक

सरसंघचालक मोहन भागवत यांची दिल्लीत 50 मुस्लिम धर्मगुरुंसोबत महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीतील हरियाणा भवन येथे 50 मुस्लिम धर्मगुरू आणि बुद्धिजीवींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. अखिल भारतीय इमाम संघटनेने आयोजित केलेल्या या बैठकीत इमामांमध्ये एकता, सहकार्य वाढवणे, धार्मिक-सामाजिक मार्गदर्शन, आंतरधार्मिक संवाद आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्यावर चर्चा झाली. बैठकीला संघाचे सर कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल, रामलाल आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेश कुमार उपस्थित होते. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांच्यासह अनेक नामवंत विद्वान आणि विचारवंत सहभागी झाले.

या बैठकीचा उद्देश समाजातील सलोखा, परस्पर समज आणि सामाजिक ऐक्य वाढवणे हा होता. हिंदू-मुस्लिम समाजांमधील गैरसमज दूर करून शांतता आणि सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन, जी हिंदुस्थानातील सुमारे पाच लाख इमामांचे प्रतिनिधित्व करते, आंतरधार्मिक शांततेसाठी कार्यरत आहे. यापूर्वीही मोहन भागवत यांनी डॉ. इलियासी यांच्या निमंत्रणावरून मशिदीला भेट दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता