मोहन भागवत यांनी घेतली मौलवींची भेट, मग हिंदुत्वावरून वाटाण्यासारख्या उडणाऱ्या नितेश राणेंनी राजीनामा द्यावा; संजय राऊत यांचा टोला

मोहन भागवत यांनी घेतली मौलवींची भेट, मग हिंदुत्वावरून वाटाण्यासारख्या उडणाऱ्या नितेश राणेंनी राजीनामा द्यावा; संजय राऊत यांचा टोला

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत काही मौलवींची भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणी हिंदुत्वावरून वाटाण्यासारख्या उडणाऱ्या नितेश राणेंनी राजीनामा द्यावा असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच नितेश राणेंनी मोहन भागवत यांचा ताबडतोब निषेध करावा तरच तुम्ही हिंदुत्वावादी असाल असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोहन भागवत यांनी देशातल्या मौलवींची भेट घेतली. या प्रकरणी नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. कारण ही बाब त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे. सरसंघचालक मोहन भागवत जर मुस्लिम मौलवींसोबत जर चर्चा करत असतील, त्यांची मतं समजून घेत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत असतील, तर नितेश राणेंनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी भाजप आणि संघाचा निषेध करावा. कारण त्यांच्या कठोर हिंदुत्ववादाच्या विचारात ते बसत नाहीत. खुर्चीला चिकटून बसू नका, धर्मासाठी, हिंदुत्वासाठी राजीनामा द्या. मोहन भागवत यांचा ताबडतोब निषेध करा तरच तुम्ही हिंदुत्वावादी. या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान समाज राहतो. त्यांच्यापुढे पाकिस्तानात जाण्याचा पर्याय होता त्यांनी भारत हा आपला देश मानला. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजप नव्हता. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधींजींच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज होता. अनेक वीर मुस्लिम हे फासावर गेले. अश्फाखुल्ला खानसारखी अनेक लोक फासावर गेलेत. त्यांच्यामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतील त्या दूर गेल्या पाहिजेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शाहीर अमर शेखसारखे लोकं काम करत होते. हमीद दलवाईसारखे राज्यात समाजसुधारणेचं काम करत होते. जे वातावरण बिघडवत आहेत हे या लोकांनी समजून घेतले पाहिजे. मोहनराव भागवत यांच्या कार्याचे मी स्वागत केले आहे. राष्ट्र एक ठेवायचं असेल, राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल तर हिंदुत्वासोबत इतर लोकांना सामावून ठेवलं पाहिजे. फडणवीस आणि योगींच्या मंत्रिमंडळात जे काही लोक बसले आहेत ना त्यांना मोहन भागवतांचे हे काम मान्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. नितेश राणे यांनी ताबडतोब राजीना द्यायला पाहिजे. हिंदुत्वाच्या मुद्यावर नुसता वाटाण्यासारखा उडत असतो. त्याचे जुने फोटे बघा, नमाज पढतोय, ते आणि त्याचे वडिल रोजा सोडत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

उपराष्ट्रपतीपदासाठी आम्ही उमेदवार देणार नाही. समोरून कोण बाहुला बसवतील, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार ठरवू. इथे संख्याबळाचा नाहिये जर तु्म्ही अभ्यास केला तर कळेल की लोकसभेतही भाजपकडे पूर्ण संख्याबळ नाही. अनेक पक्षांच्या टेकूवर त्यांचे बहुमत टिकून आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
महिला, तरुणींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय
अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी
सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत