पंतप्रधान खोटारड्यांचे सरदार, देशाची दिशाभूल करत आहेत; काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका
संघ आणि भाजपचे लोक विषासारखे आहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली. तसेच पंतप्रधान खोटारड्यांचे सरदार, देशाची दिशाभूल करत आहेत असेही खरगे म्हणाले.
मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, संविधानात 50 टक्क्यांपर्यंत आरक्षणाची मर्यादा आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या समाजासाठी 10 टक्के आरक्षण वाढवले, त्यामुळे आता आरक्षणाची एकूण मर्यादा 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तसेच पंतप्रधान मोदी खोटारड्यांचे सरादर आहेत. जर आमच्या पक्षाला थोड्या जागा अधिक मिळाल्या असत्या, तर आम्ही सत्तेवर आलो असतो आणि भाजपचं सरकार पाडलं असतं. संघ आणि भाजपचे लोक विषासारखे आहेत. त्यांचं समर्थन करू नका, एकदा का तुम्ही त्यांची साथ दिली तर तुमचं अस्तित्व संपेल.
खरगे म्हणाले की, नरेंद्र मोदी खोटं बोलून देशाला फसवत आहेत. असे पंतप्रधान देशासाठी उपयोगी ठरत नाहीत. राहुल गांधी हे सवर्ण असूनही, ते दलित आणि मागासवर्गीयांसाठी बोलतात, त्यामुळे सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. बहुतांश गावांमध्ये फक्त 2-3 टक्केच वरच्या जातीचे लोक असतात, पण तरीही देशावर त्यांचेच राज्य आहे असेही खरगे म्हणाले.
बिहारमध्ये सुरू असलेल्या SIR मोहिमेवरून संसदेत विरोधकांनी मोठा विरोध केला. 25 जुलै रोजी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी, मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘SIR’ लिहिलेला पोस्टर फाडून कचऱ्यात टाकला आणि त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला.
चुनाव आयोग ने आज आधिकारिक एलान किया है कि वह Special Intensive Revision (SIR) Exercise पूरे देश में लागू करेगा।
मोदी सरकार ग़रीबों, दलितों, आदिवासियों, पिछड़े वर्ग, अल्पसंख्यकों और वंचितों के वोट काटना चाहती है, ताकि वो भारत के संविधान को मनुस्मृति के मुताबिक बदलाव कर सके।… pic.twitter.com/wGjYXIADGL
— Mallikarjun Kharge (@kharge) July 25, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List