Operation Sindoor वर संसदेत पहिल्यांदाच सरकारने दिलं उत्तर, परराष्ट्र राज्यमंत्री काय म्हणाले? वाचा…

Operation Sindoor वर संसदेत पहिल्यांदाच सरकारने दिलं उत्तर, परराष्ट्र राज्यमंत्री काय म्हणाले? वाचा…

केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत पहिल्यांदाच ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धविरामाबाबत उत्तर दिले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ति वर्धन सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आले होते.”

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांच्या प्रश्नांना उत्तर देताना  कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानने 7 मे रोजी पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानी लष्करी तळ आणि नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले.

युद्धविरामाच्या प्रश्नावर ते म्हणाले, 10 मे रोजी पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) हिंदुस्थानी समकक्षांशी संपर्क साधला आणि गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवण्याची विनंती केली. त्याच दिवशी नंतर युद्धविरामावर सहमती झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
महिला, तरुणींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय
अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी
सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत