आता रेल्वेचे तिकीट ईएमआयवर मिळणार, भारत गौरव यात्रेसाठी खास ऑफर

आता रेल्वेचे तिकीट ईएमआयवर मिळणार, भारत गौरव यात्रेसाठी खास ऑफर

आता रेल्वे तिकीटसुद्धा हप्त्यावर म्हणजे ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. लांबपल्ल्याच्या रेल्वेचे तिकीट खरेदी करताना ईएमआयचा पर्याय दिसणार आहे. त्यासाठी रेल्वेने एक स्पेशल टूर पॅकेज आणले आहे. हे पॅकेज घेतल्यानंतर प्रवाशांना तिकिटाचे पैसे हप्त्याने चुकवता येतील. ईएमआयद्वारे ही रक्कम भरता येईल. रेल्वेकडून देशातील प्रसिद्ध तीर्थस्थळांसाठी स्पेशल टूर पॅकेज देण्यात येते. भारत गौरव यात्रा नावाने हे पॅकेज असते. या योजनेंतर्गत ट्रेनचे टूर पॅकेज सहज बुक करता येते आणि प्रवास झाल्यानंतर हप्त्याने तिकिटाचे पैसे भरू शकतो.

आयआरसीटीसीची भारत गौरव ट्रेनसाठीच ही ऑफर आहे. हे ट्रेन तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना ईएमआयचा पर्याय मिळतो. समजा तुम्ही 13 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंतच्या भारत गौरव ट्रेनचे तिकीट बुक केले. या ट्रेनच्या इकोनॉमी क्लासचे भाडे हे 18460 रुपये प्रति व्यक्ती आहे. त्यामध्ये स्लीपर क्लासचे ट्रेन तिकीट, हॉटेल खर्चाचा समावेश आहे. कुटुंबासोबत प्रवास करायचा असेल तर रक्कम वाढते, त्यामुळे ईएमआयची सुविधा दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एअर इंडियाने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड एअर इंडियाने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह अद्याप त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पाठवलेल्या मृतदेहांपैकी 12 मृतदेहांचे अवशेष हे...
राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
वेगावर स्वार होऊन भेदक मारा करणारी क्रांती गौड आहे तरी कोण? तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा अर्धा संघ धाडला होता तंबूत
Operation Sindoor – दाल में कुछ काला है, ट्रम्प यांच्या दाव्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
गुजरात ATS कडून अल कायदाशी संबंधित चार संशयितांना अटक; घातपाताच्या तयारीत असल्याचा संशय
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर 16 तास होणार चर्चा; सरकारने दिली माहिती
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खुर्ची सुरक्षित नाही…; काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या वक्तव्याने खळबळ