एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या मनमानीने घेतला प्रकल्पग्रस्त दाम्पत्याचा बळी, मुलीला नोकरी न दिल्याने कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवले

एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या मनमानीने घेतला प्रकल्पग्रस्त दाम्पत्याचा बळी, मुलीला नोकरी न दिल्याने कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवले

सरकारी कार्याल याचे वारंवार उंबरठे झिजवूनही मुलीला नोकरी न दिल्याने शेतकरी आदिवासी दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आपले आयुष्य संपवले आहे. मंगल उघडा (45) व संगीता उघडा (40) अशी त्यांची नावे असून एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या मनमानीने बाधित प्रकल्पग्रस्त पती-पत्नीचा बळी घेतला आहे. मुरबाड तालुक्यातील सुकाळवाडी येथे ही घटना घडली असून निर्दयी सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अन्य बाधित प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

उघडा हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मुलीला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत होते. प्रकल्पग्रस्त म्हणून मुलगा करण हा नवी मुंबई महापालिकेत नोकरीला होता. मात्र गेल्या वर्षी 8 मार्च रोजी त्याचा अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या जागेवर मुलगी कल्पना हिला सरकारी नोकरी मिळावी यासाठी उघडा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाकडे अर्ज केला. पण त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. मंगल उघडा यांनी अंबरनाथच्या बारवी धरण विभागात देखील कार्यकारी अभियंत्यांकडे नोकरीसाठी अर्ज केला. तरीही न्याय मिळाला नाही.

567 प्रकल्पबाधित नोकरीपासून वंचित

बारवी धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या अशा कुटुंबातील एका व्यक्तीला महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाले होते. त्यापैकी काही जणांना नोकऱ्या मिळाल्या पण 567 प्रकल्पबाधित नोकरीपासून वंचित असल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी व दुर्लक्ष यामुळे अखेर उघडा दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. मुरबाड तालुक्यात संताप व्यक्त होत असून 15 जुलै रोजी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा बारवी पीडित संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर यांनी दिला आहे.

– उघडा दाम्पत्याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने मुलीला नोकरी द्या, असे आर्जव वारंवार करूनही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही.

– अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे अखेर मंगल उघडा व संगीता उघडा यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. घरातील कमवता मुलगा दगावल्याने पती-पत्नीने मृत्यूला कवटाळले.

-या दाम्पत्याला उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल मध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच ४ जुलै रोजी मंगल यांचा तर त्यांची पत्नी संगीता यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND vs ENG 4th Test –  ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत, टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता IND vs ENG 4th Test – ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत, टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. दिवसाअखेर टीम इंडियाने चार गड्यांच्या मोबदल्यात 264 धावा...
दौंडमध्ये आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचा कला केंद्रात गोळीबार, 36 तासांनंतर चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल
IND Vs ENG 4th Test – यशस्वी जयस्वालची ओल्ड ट्रॅफर्डवर ऐतिहासिक खेळी, तब्बल 50 वर्षांनी ठोकलं पहिलं अर्धशतक
राजीनामा दिल्यानंतर लगेच सामानाची बांधाबांध, जगदीप धनखड लवकरच उपराष्ट्रपती भवन रिकामं करणार
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल
हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसतात ही लक्षणे, कशी ओळखावी? वाचू शकतो जीव
नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर