सत्ताधारी पक्षानं जाहीर सांगितलंय, काहीही करा अन् बॉसकडे या! विधानभवनातील राड्यावर भास्कर जाधव यांची परखड प्रतिक्रिया

सत्ताधारी पक्षानं जाहीर सांगितलंय, काहीही करा अन् बॉसकडे या! विधानभवनातील राड्यावर भास्कर जाधव यांची परखड प्रतिक्रिया

काल विधानभवनामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. ये ते होना ही था! हे घडणारच होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या आवारात जमा होणाऱ्या गर्दीवर प्रश्न उपस्थित केला.

पूर्वीच्या चार-सहा अधिवेशनात मी सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला की, अधिवेशन काळामध्ये इतके लोक येतात कशी? यांना पास देतो कोण? रेल्वे स्थानकाप्रमाणे सभागृह फुललेले असते. या गर्दीमुळे काहीतरी अघटीत घडेल आणि अशा गर्दीला आळा बसेल असे मला वाटत होते. कारण गर्दीतून वाट काढत सभागृहातून बाहेर यावे लागते. मुख्य दरवाजाचा सेल्फी पॉ़इंट झाला आहे. पायऱ्यांवर कुणी येते आणि फोटो काढत असतो. अरे चालले काय? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, विधिमंडळाच्या पासच्या विक्री होती अशी बातमी मागे आली होती. पण काल थोडक्यात वाचले. भविष्यात याला आळा बसला नाही तर परिस्थिती फार भयानक होईल. आत येऊन एकमेकांना भिडणे, एकमेकांचे हिशेब चुकते करण्याची जागा विधानभवन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

विधिमंडळाच्या आवारात, फ्लोअरवर आणि लॉबीतही काही पक्षाचे लोक छातीवर चिन्ह लावून खुलेआम वावरत असतात. काय चालले आहे हे? असा सवाल करत सत्ताधारी पक्षाने जाहीर सांगितले की, काही करा आणि बॉसकडे या, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.

विधानभवनात गँगवॉर; महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा! संजय राऊत आक्रमक, टीम फडणवीसच्या चौकशीची मागणी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – महावितरणच्या हलगर्जीपणाचे दोन बळी, विद्युत तारांना स्पर्श होऊन तरुणांचा मृत्यू Ratnagiri News – महावितरणच्या हलगर्जीपणाचे दोन बळी, विद्युत तारांना स्पर्श होऊन तरुणांचा मृत्यू
महावितरणच्या पडलेल्या विद्युतभारीत तारांना स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावात घडली. हे...
माध्यमांसमोर बेताल बडबड आली अंगलट, नितेश राणे माझगाव कोर्टात हजर राहणार; वकिलांची दंडाधिकारी न्यायालयात हमी
कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात, गुन्हेगारांवर कारवाई होणार का? विधानसभेत भास्कर जाधव यांचा सवाल
Ratnagiri News – कोकण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव, विनायक राऊत यांचा आरोप
Jammu Kashmir – भरधाव ट्रकची कारला धडक, अपघातात अमरनाथला चाललेले 8 भाविक जखमी
Video – विधानभवनातील राड्यावर अंबादास दानवे काय म्हणाले?
सत्तेचे माजकारण! संपूर्ण देशात महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी मालिका राज्यात सुरू – उद्धव ठाकरे