अर्धा पगार रोखीने, अर्धा ऑनलाइन; बेस्टच्या गोंधळाचा कर्मचाऱ्यांना मनस्ताप

अर्धा पगार रोखीने, अर्धा ऑनलाइन; बेस्टच्या गोंधळाचा कर्मचाऱ्यांना मनस्ताप

बेस्ट उपक्रमामध्ये पगाराचा गोंधळ सुरू आहे. कर्मचारी, अधिकाऱयांना अर्धा पगार ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात, तर अर्धा पगार रोखीने दिला जात आहे. रोख रक्कम मिळवण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱयांना दर महिन्याला मूळ आगारात खेटे मारावे लागत आहेत. हा मनस्ताप थांबवण्यासाठी योग्य नियोजन करून पूर्ण पगार कर्मचाऱयांच्या बँक खात्यात जमा करा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने केली आहे. तसे निवेदन पालिका आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.

बेस्ट कर्मचाऱयांना पूर्वी पूर्ण पगार रोखीने दिला जायचा, मात्र मागील चार वर्षांत नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक व विद्युत पुरवठा विभागातून दररोज येणारी रोख रक्कम तशीच पडून राहत आहे. त्याचा फटका कर्मचाऱयांना बसला आहे. ‘सर्वत्र ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य दिले जात असताना बेस्ट प्रशासन अर्धा पगार रोखीने देऊन पाऊल मागे का टाकतेय,’ असा सवाल बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे.

अर्ध्या पगारावर कर्ज मिळेना!

मासिक पगार दोन तुकड्यांत देण्याच्या बेस्टच्या कारभारामुळे कर्मचाऱ्यांना बँकांकडून अपेक्षित कर्ज मिळवणे मुश्कील झाले आहे तर कर्ज घेतलेल्या कर्मचायांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दर महिन्याला रोखीने घेतलेला पगार बँकेत जमा करावा लागत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वयाच्या तिशीनंतर हाडांचं दुखणं सुरु, या 5 टेस्ट नक्की करा वयाच्या तिशीनंतर हाडांचं दुखणं सुरु, या 5 टेस्ट नक्की करा
वयाच्या तिशीनंतर शरीरात अनेक हार्मोनल आणि मेटाबॉलिक बदल होत असतात. या वयात बोन डेन्सिटी कमी होणे सुरु होत असते. जर...
करेंगे दंगे चारो ओर… कुणाल कामराने पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना डिवचले
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Hair Care – केसांसाठी तुरटी वरदानापेक्षा कमी नाही
विधान भवनातील टोळीयुद्धानंतर विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, काय दिले आदेश? वाचा…
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, आता तो विधानभवनापर्यंत पोहोचला आहे – अंबादास दानवे
Skin Care – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरातील ‘हे’ पीठ आहे सर्वात उत्तम, वाचा