सावधान, उंदरांमुळे किडनी आणि लिव्हर फेल, दोन जणांचा मृत्यू, एक अत्यवस्थ

सावधान, उंदरांमुळे किडनी आणि लिव्हर फेल, दोन जणांचा मृत्यू, एक अत्यवस्थ

मध्य प्रदेश | 20 मार्च 2024 : उंदीराच्या प्रजातीने आपल्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत असते हे आपण ऐकून आहोत. आपल्या देशात अन्नधान्याची साठवण करण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने आपले अर्धेअधिक धान्य हे उंदरांकडून नासधुस केल्याने नष्ट होत असते. परंतू उंदराचा हा त्रास येथपर्यंतच थांबत नाही तर आता उंदरामुळे माणसांना प्राणघातक आजार होत आहेत. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात उंदराच्या प्रकोपाने लेप्टोस्पायरोसिस नावाच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. या आजाराने आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचे प्राण अत्यवस्थ असून त्याच्यावर जबलपूर मेडीकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा आजार उंदरामुळे पसरतो. या आजाराने एका 13 वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षीया मुलीचा मृत्यू झाला आहे. तर एका 35 वर्षीय युवकाचा मृत्यूशी संघर्ष सुरु आहे.

लेप्टोस्पायरोसिस या आजाराला उंदराच्या शरीरात असलेले व्हायरस जबाबदार असतात. उंदीर मलमुत्रातूनही हे विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करु शकतात. उंदीरानी उष्ठवलेले अन्न खाऊनही देखील हा आजार होऊ शकतो असे जिल्हा रुग्णालयात तैनात इपिडिमोलॉजिस्ट अनिल सिंह यांनी सांगितले आहे. उंदराच्या मलमूत्राने दुषित झालेला बिछाना आणि कपडे यांचा वापर आपण केला तरी हे विषाणू त्वचेतून आपल्या शरीरात शिरकाव करू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.

लिव्हर आणि किडनीवर परिणाम

एकदा का उंदीराच्या मलमुत्रातील या आजाराचे विषाणू मानवी शरीरात घुसले की लोकांना ताप, अंग दुखणे, उल्टी, जुलाब, किंवा शरीरावर लाल चट्टे उमटणे अशी लक्षणे दिसू लागतात. हा आजार लवकर बरा होत नाही. त्यामुळे माणसाच्या लिव्हर आणि किडनीवर याचा हल्ला होतो. माणसाचे वजन झपाट्याने घटते. शरीर कमजोर होते. आजाराने रक्त दुषित होते. आणि मनुष्य सातत्याने कमजोर होत जातो.

दहा दिवसाने अहवाल येतो

हा आजार झाल्यानंतर त्याची तपासणी करावी लागते. त्याची चाचणी केल्यानंतर आजाराचे निदान करण्यासाठी वेळ लागतो. येथे मध्य प्रदेशात याची चाचणी जबलपूरला होते. आजूबाजूला येथे कुठेही या आजाराच्या चाचणीची सुविधा नाही. याचा अहवाल दहा दिवसात येतो. उमरीया जिल्ह्यात नमूने 5 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान घेतले गेले, त्याचा अहवाल आला आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची अवस्था गंभीर असल्याचे डॉ. अनिल सिंह यांनी सांगितले.

दुर्लक्ष महागात पडेल

या आजाराकडे दुर्लक्ष झाले तर माणसाचा एक ते दीड महिन्यात मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांची भेट तातडीने घेऊन योग्य उपचार सुरु केले पाहीजेत, अन्य औषधांसह एंटीबायोटीक औषधे घ्यायला हवीत, हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे तो स्पर्शाने पसरत नाही. हा आजार रोखण्यासाठी आजू बाजूचा परिसर स्वच्छ राखावा, घरात उंदरांना येऊ देऊ नये. उंदरांनी उष्ठवलेले अन्न खाऊ नये. त्याच्या मलमूत्रापासून दूर राहावे. हा ज्युनिटीक डिसीज आहे. यापासून सावध रहावे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;