तुम्ही देखील कमी झोप घेताय तर तुम्हाला होऊ शकतो हा गंभीर आजार

तुम्ही देखील कमी झोप घेताय तर तुम्हाला होऊ शकतो हा गंभीर आजार

Diabetes : मधुमेह हा एक असा आजार आहे जो झपाट्याने वाढतोय. भारतात मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. या आजारात शरीर योग्य प्रमाणात इंसुलिन तयार करू शकत नाही किंवा त्याचा योग्य वापर करू शकत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे हृदय, नसा इत्यादी शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होऊ लागतो. आता भारताला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाऊ लागले आहे. कारण येथे दरवर्षी या आजाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

संशोधनात काय आले समोर

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च- डायबिटीज इंडियानुसार, 2023 मध्ये सुमारे 10.1 कोटी मधुमेहाचे रुग्ण आढळले होते. IDF डायबिटीज ऍटलसच्या 2021 च्या सर्वेक्षणानुसार, जगभरात चीननंतर भारतात मधुमेहाची सर्वाधिक प्रकरणे आहेत, जी येत्या 20 वर्षांमध्ये जवळपास दुप्पट होऊ शकतात.

हा आकडा नक्कीच चिंता वाढवणारा आहे, कारण या आजारामुळे एखाद्याला कोणत्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. व्यक्तीची खराब जीवनशैली यामुळे तो वाढत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, कमी झोप यामुळे आपल्या आरोग्यात बरेच बदल झाले आहेत. एका संशोधनात आपली झोप आणि मधुमेह यांच्यातील संबंधही समोर आला आहे.

रोज किती तास झोप घेणे महत्त्वाचे

जामा ओपन नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक दररोज फक्त 3-5 तास झोप घेतात त्यांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. संशोधनात असे आढळले की, फक्त 3-5 तास झोपणाऱ्या व्यक्तींना टाइप-2 मधुमेहाचा धोका असतो, परंतु निरोगी खाण्याच्या सवयींनी मधुमेहाचा धोका कमी केला जाऊ शकतो. जे लोक निरोगी आहाराचे पालन करतात परंतु 6 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना देखील मधुमेहाचा आजाराचा धोका असतो.

त्यामुळे झोप ही किती महत्त्वाची आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी करायचा असेल तर तुम्हाला झोपण्याची सवय सुधारावी लागेल. अन्यथा तुम्ही देखील  मधुमेहाला बळी पडू शकता. त्यामुळे प्रत्येकाने दररोज वेळेवर झोपणे आवश्यक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;