पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी कुठे आहेत? चीनच्या घुसखोरीवर केंद्र सरकार अजूनही गप्प; आदित्य ठाकरे यांचा निशाणा

पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी कुठे आहेत? चीनच्या घुसखोरीवर केंद्र सरकार अजूनही गप्प; आदित्य ठाकरे यांचा निशाणा

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्वतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली. आणि विनंती केली. सर्वपक्षीय शिष्टमंडळामागे राजकीय हेतू आहे का? भाजपचा त्या मागे काही विचार आहे का? अशा आमच्या काही शंका होत्या. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ देशहितासाठी आहे. आणि आम्ही देशासाठी बलिदान द्यायला तयार आहोत. देशाची एकता, अखंडता, देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. जे हल्ले झालेत ते पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने केलेले आहेत. हेच जगभरात सिद्ध करायचे आहे. हा दहशतवाद संपवण्यासाठी जगाने एकजूट होणं गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे, हे काल ट्विटरवरूनही आम्ही स्पष्ट केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

दुसरं महत्त्वाचं, पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी कुठे आहेत? कुठून आले? हे प्रश्न आम्ही देशात उपस्थित करतच राहणार आहोत. मात्र, कुठलंही राजकारण न करता जागतिक स्तरावर आम्ही सर्व एकजूट आहोत, हे आम्ही आधीच सांगितले आहे, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

डोसियर बनवतोय आणि खासदारांचं शिष्टमंडळ विदेशात पाठवतोय, पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत?; काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्यातील तिन्ही दलांचे यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांचे कौतुक अन् त्यांना सलाम आम्ही सर्वच करत आहोत. मात्र, पिक्चर अभी बाकी है, असे संरक्षणमंत्र्यांनी आणि काहीजणांनी म्हटले आहे. आम्हीही तीच वाट पाहतोय की पाकिस्तानात घुसून आपण पाकव्याप्त कश्मीर पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. आणि सर्वच्या सर्व दहशतवादी तळं उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही सर्वपक्ष एकजूट आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी

चीनच्या घुसखोरीवर बऱ्याच काळापासून केंद्र सरकार गप्प आहे. चीन असो वा पाकिस्तान सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण हे दोन्ही घुसखोर आहेत. पहलगाम हल्ला झाला आणि त्या पूर्वीही देशाची सुरक्षा आणि अखंडतेसाठी आम्ही सर्वपक्ष एकत्र आहोत. यात कुठलाही राजकीय वाद नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने वसूली? शिवसैनिकांची धडक, पीएची पळापळ; संजय राऊतांच्या ट्विटने उडाली खळबळ कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने वसूली? शिवसैनिकांची धडक, पीएची पळापळ; संजय राऊतांच्या ट्विटने उडाली खळबळ
धुळ्यातील सरकारी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांची वसूली सुरू असल्याचे धक्कदायक वृत्त समोर आले आहे. शिवसेना (उद्धव...
Photo : Indian Queen Of Cannes… पाहा ऐश्वर्याचा जरबदस्त लूक
राज्यात अवकाळीचा तडाखा; महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, कुठे-कुठे पाऊस?
मराठवाड्यात ‘बोल्ट अरेस्टर’ न लावल्याने, वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांत वाढ
How to Remove Ear Wax: कानातला मळ कसा काढावा? डॉक्टरांकडूनच जाणून घ्या
सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी, महाराष्ट्र कुठे जातोय? – सुप्रिया सुळे
अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण, आजपासून होणार ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश