थंडी आणि उष्णतेने घेतला 35 हजार लोकांचा बळी, 2001 ते 2019 दरम्यानच्या अभ्यासातून काढले निष्कर्ष

थंडी आणि उष्णतेने घेतला 35 हजार लोकांचा बळी, 2001 ते 2019 दरम्यानच्या अभ्यासातून काढले निष्कर्ष

हिंदुस्थानात 2001 ते 2019 दरम्यान अति उष्ण आणि अति थंड वातावरणामुळे किमान 35 हजार लोकांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढला आहे. 2001 ते 2019 दरम्यान हिंदुस्थानात उष्माघात आणि थंडीमुळे अनुक्रमे 19 हजार 693 आणि 15 हजार 197 मृत्यू झाले. 2015 मध्ये उष्माघातामुळे 1,907 आणि थंडीमुळे 1,147 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. डेटा हवामान विभाग आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो व अन्य डेटाच्या वापर करून हे विश्लेषण करण्यात आलंय.

‘जर्नल टेम्परेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांमध्ये उष्माघात आणि अतिथंड तापमानाच्या संपर्कात आल्याने मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे नोंदवण्यात आलंय. हरयाणाच्या ओ पी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे प्रमुख लेखक प्रदीप गुइन म्हणाले की, अति उष्णतेच्या संपर्कात आल्याने होणारे मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत आणि आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे

  • काम करणाऱ्या पुरुषांमध्ये अति तापमानामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले.
  • 2001-2019 च्या कालावधीत अति उष्णतेमुळे होणारे मृत्यू पुरुषांमध्ये तीन ते पाच पट जास्त होते, तर अति थंडीमुळे होणारे मृत्यू महिलांच्या तुलनेत चार ते सात पट जास्त होते, असे संशोधकांनी सांगितले.
  • राज्यनिहाय आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये उष्माघातामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आढळून आले, तर अतिथंडीमुळे होणारे सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहारमध्ये झाले.
  • संशोधनाचे प्रमुख लेखक प्रदीप गुईन म्हणाले, ‘थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत उष्माघातामुळे होणारे मृत्यू अधिक लक्षणीय आहेत.’
  • ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या सार्वजनिक आरोग्य आणि मानवी विकास शाळेतील सहलेखिका नंदिता भान म्हणाल्या की, या आकडेवारीवरून आपल्याकडे उष्णता आणि थंडी कृती योजनांची तातडीची गरज अधोरेखित होते.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘फुले’ सिनेमा सेंसॉरच्या कचाट्यातून सुटल्यानंतर रिलीज झाला आहे. हा एक ऐतिहासिक आणि...
‘120 कोटी रुपयांची कमाई तर केवळ…’, WAVES Summit 2025 मध्ये ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ बद्दल सांगितले…
तर अर्धे जग आपले चित्रपट पाहील, चीनचा उल्लेख करून आमीर खान नेमकं काय म्हणाला?
Hingoli Accident – भरधाव डंपर भरबाजारात घुसला, नागरिकांना चिरडत रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
26/11 Mumbai terror Attack – NIA ने तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे घेतले नमुने
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं चीन कनेक्शन! बंदी असलेल्या चिनी सॅटेलाइट फोनचा वापर
Pahalgam Attack – पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच CM ओमर अब्दुल्लांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, आर्धा तास चालली बैठक