मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…

मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…

पुण्यात मैत्रिणीवरून आणि भागीदारीत असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून दोन मित्रांचे भांडण झाले. या वेळी एका मित्राने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा बनाव केला. त्यामुळे दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी लोहमार्गावर गेला. मात्र, रेल्वे येताच आत्महत्येचा प्रयत्न करणारा मित्र बाजूला झाला आणि वाचविण्यासाठी गेलेल्या मित्राचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना 3 एप्रिल रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

गणेश विठ्ठल लाड (रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश याचे वडील विठ्ठल किसन लाड (वय 53) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजित गणेश गोळे (वय 25, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश लाड आणि अभिजित गोळे हे मित्र होते. गणेश याच्या मैत्रिणीवरून आणि त्या दोघांमध्ये भागीदारीत असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून त्यांच्यात वाद झाले. त्यावरून अभिजितने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा बनाव केला. तो रावेत येथे आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्गावर गेला.

मित्र आत्महत्या करत असल्याने त्याला वाचवण्यासाठी गणेश गेला. अभिजित लोहमार्गावर असल्याने त्याला बाजूला करण्यासाठी गणेश देखील लोहमार्गावरून जात होता. याचवेळी रेल्वे आली असता अभिजित अचानक ट्रॅकवरून बाजूला झाला आणि गणेश रेल्वेखाली चिरडला गेला. जखमी गणेश याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता अभिजित पळून गेला. यामध्ये गणेश याचा मृत्यू झाला. फौजदार राहुल खिळे तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’
“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा
पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात