परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांचे दिवास्वप्नच, टास्क फोर्सला मुदतीत अहवाल सादर करता आला नाही

परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांचे दिवास्वप्नच, टास्क फोर्सला मुदतीत अहवाल सादर करता आला नाही

महाराष्ट्रात परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच दोन लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत शिफारशी सादर करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स स्थापन केला होता; पण या टास्क फोर्सला तीन महिन्यांच्या मुदतीत अहवाल सादर करता आलेला नाही. त्यामुळे या टास्क फोर्सला मुदतवाढ देण्याची वेळ सरकारवर आली आहे. त्याशिवाय सायबर सुरक्षा धोरण विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्ससह सेंटर ऑफ एक्सलन्सच्या टास्क फोर्सलाही मुदत दिली आहे.

महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्रांचा देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात निर्यातीसाठीचा वाटा सध्या 60 अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचा अंदाज आहे. पण 2020पर्यंत हाच वाटा 110 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक क्षमता केंद्रांची संख्या सध्याच्या 1 हजार 900वरून 2 हजार 500पर्यंत वाढेल. या सर्वांमधून दोन लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी...
“कसलाच पश्चात्ताप नाही..”; अमृताला कानाखाली वाजवल्याप्रकरणी अखेर ईशाने सोडलं मौन
मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…
साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू
पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले
भीमा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू; गढूळ पाण्यामुळे बठाण, उचेठाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर