धक्कादायक! महाराष्ट्रात चार महिन्यांत 20 वाघांचा मृत्यू!!

धक्कादायक! महाराष्ट्रात चार महिन्यांत 20 वाघांचा मृत्यू!!

 महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण झपाटय़ाने वाढल्याची चिंताजनक वस्तुस्थिती समोर आली आहे. मागील चार महिन्यांत देशात 62 वाघांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात 20 वाघांना प्राण गमवावा लागला. एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असल्याचा दावा केला जात आहे.
 दुसरीकडे वाघांचा मृत्युदर वाढल्याने वन्यप्राणीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशात 4 महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाला. सरकारने वाघांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार असल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात वाघांच्या शिकारीचे प्रकार नियंत्रणात आलेले नाहीत. त्यामुळे वाघांचा मृत्युदर वाढल्याची गंभीर आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नुकतीच व्याघ्रमृत्यूची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशभरात 1 जानेवारी ते 26 एप्रिल या चार महिन्यांत 62 वाघांचा मृत्यू  झाला. त्यात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आढळले. वन्यजिवांच्या झुंजी, शिकार, अपघात आणि नैसर्गिक मृत्यू अशा विविध कारणांनी वाघांच्या संख्येत चिंतनीय घट झाली आहे. राज्यात मागील पाच वर्षांत 41 वाघ आणि 55 बिबटय़ांची शिकार झाल्याचे नुकतेच उघडकीस आले होते.
देशातील व्याघ्र मृत्यूचा  चढता आलेख 
वर्ष मृत्यू 
2020 106 
2021 127 
2022 121 
2023 178 
2024 124 
2025  
(जानेवारी ते एप्रिल) – 62
वाढत्या मृत्यूमागे संघटित टोळी
2022मध्ये देशात 3 हजार 167 वाघांची नोंद झाली. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. राज्यात 2018मध्ये 312 वाघांची नोंद झाली होती. पुढच्या चार वर्षांत त्यात मोठी वाढ झाली होती आणि ती संख्या 444वर पोहचली होती. व्याघ्र संवर्धनामध्ये आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्रात अलीकडे व्याघ्रमृत्यूची संख्या वाढली आहे. वाघांच्या वाढत्या मृत्यूमागे संघटित गुन्हेगारी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं
सर्वांच्या मनावर राज्य करणारा क्रिकेटर, सर्वांचा लाडका खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट खेळण्यातून आता निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निर्णयाने नक्कीच...
बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले
IPL 2025 – आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार सामने
पापाने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी, संजय राऊत यांचा निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू