जेईई मेन्समध्ये मिळवले 300 पैकी 300 गुण; मोबाईल वापरणे बंद, दररोज आठ तास अभ्यास

जेईई मेन्समध्ये मिळवले 300 पैकी 300 गुण; मोबाईल वापरणे बंद, दररोज आठ तास अभ्यास

विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरणे कमी केल्यास आणि अभ्यासाचे नियोजन केल्यास परीक्षेत यश हमखास मिळते, असे सांगितले जाते. भुवनेश्वर येथील ओमप्रकाश बेहराने मोबाईल वापरणे बंद करत दररोज किमान आठ तास अभ्यास केल्याने त्याला जेईई मेन्समध्ये घवघवीत यश मिळाले आहे. तो ओडिशा राज्यातून पहिला आला असून त्याला 300 पैकी 300 गुण मिळाले आहेत. तो गेल्या तीन वर्षांपासून राजस्थानच्या कोटामध्ये राहून जेईईची तयारी करत होता. शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने फॉलो केल्या. अखेर त्याला मेहनतीचे फळ मिळाले. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. तो सतत अभ्यासात गुंतून असायचा. दहावीला त्याला 92 टक्के गुण मिळाले होते. ओम प्रकाशचा जन्म 12 जानेकारी 2008 रोजी ओडिशातील उच्च शिक्षित कुटुंबात झाला. कडील कमलाकांत बेहरा हे शासकीय अधिकारी आहेत. ओमप्रकाश बेहरा कोचिंग सोबत 8 ते 9 तास अभ्यास करायचा. बाराकीत सुद्धा चांगले मार्क मिळतील, अशी अपेक्षा ओम प्रकाश बेहराला आहे.

आयआयटी मुंबईत शिकायची इच्छा

ओमप्रकाशला आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेकचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. मोबाईल हातात असल्यानंतर अभ्यासात लक्ष लागत नाही, मन विचलित होते. त्यामुळे मी जेईईची तयारी करत असताना मोबाईलला पूर्णपणे दूर ठेवले. त्यामुळे मला हे यश मिळवता आले. ओमप्रकाशची आई स्मिता राणी या ओडिशात एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, परंतु मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन वर्षे सुट्टी घेऊन त्या कोटात मुलांसोबत राहत होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये 25 भारतीय तर एका नेपाळी...
लग्नाआधीच प्रेग्नंट,बाळाला स्वीकारण्यास बॉयफ्रेंडचा नकार; अखेर बॉलिवूड अभिनेत्रीने केलं अबॉर्शन,कंगनाने दिला धीर
‘तुझ्या मुस्लिम नवऱ्याला सोडून दे’, पाकिस्तानी युजरच्या कमेंटवर अभिनेत्रीचा संताप, म्हणाली ‘पाळलेले दहशतवादी…’
नाना पाटेकर यांनी ब्रेक दिला आणि… ; विक्रम गायकवाडांबद्दल काय म्हणाले?
सकाळी की संध्याकाळी… मधुमेहाच्या रुग्णाने कारल्याचा रस कधी प्यावा?
उच्च रक्तदाबावर रामबाण अस्त्र; पतंजली बीपी ग्रिट वटीचा फायदा जाणून घ्या
India Pak War – हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा