श्री अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडप पुनर्डभारणीस सुरुवात; नवरात्रोत्सवापूर्वी नगारखानासह मणिकर्णिका कुंडाचेही काम पूर्ण करणार

श्री अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडप पुनर्डभारणीस सुरुवात; नवरात्रोत्सवापूर्वी नगारखानासह मणिकर्णिका कुंडाचेही काम पूर्ण करणार

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचाच गेल्या तीन साडेतीन शतकांपासून भाग असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्डभारणीस आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. येत्या नवरात्रोत्सवापूर्वी गरुड मंडपासह नगारखाना आणि मणिकर्णिका कुंड पुनर्वैभवावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून आता जोर धरण्यात आला आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या उभारणीनंतरच्या काळात मंदिराला लागूनच समोर सन 1844 ते 1867 या कालावधीत गरुड मंडप बांधण्यात आला. श्री अंबाबाई मंदिरात भाविकांकडून होणारा अभिषेक विधी, गणेशोत्सव, विविध धार्मिक सोहळे तसेच पालखी मिरवणुकीवेळी उत्सवमूर्ती विराजमान होण्यासाठी गरुड मंडपाचा उपयोग केला जात आहे. पण दररोज होत असलेल्या अभिषेकाच्या पाण्यासह पावसाच्या पाण्याने या मंडपाच्या सागवानी खांबाचे बूड झिजले होते. तसेच वाळवी लागल्याने हा गरुड मंडप धोकादायक बनला होता. त्यामुळे सुरक्षेसाठी दोन वर्षांपासून या मंडपाचा वापर थांबविण्यात आला होता. मागील वर्षी नवरात्रापूर्वी मंडप उतरवण्यात आला. पण सागवान खांब न मिळाल्याने बरेच महिने हे काम रखडले होते.

सोमवारी (दि. 14) गरुड मंडपाच्या लाकडी खांब उभारणीच्या कामास द्वार प्रतिष्ठापना व पूर्णाहुती होम विधीने सुरुवात करण्यात आली. तर आज मंगळवारपासून प्रत्यक्ष खांब उभारणीला सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रौत्सवापूर्वी गरुड मंडपाचे काम पूर्ण केले जाणार आहे. खांब उभारणीनंतर कमान बसवणे, तुळई लावणे आणि छत उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.

गरुड मंडप पुनर्डभारणीसाठी स्वनिधीतून 12 कोटी 85 लाख 92 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दगडी मुरुमाचा वापर करून, गरुड मंडपाचा पाया मजबूत करण्यात आला आहे. हे खांब खचू नये तसेच हवामान आर्द्रता यापासून संरक्षण व्हावे यासाठी बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत ऑइल प्रक्रिया करण्यात आली आहे. नव्याने बनवलेले लाकडी खांब मुरूम व दगडी मुरुमाच्या पायात रोवले जाणार असल्याने अधिक भक्कम होणार आहेत. गरुड मंडपाचे खांब उभारण्याचे काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर पुढील अंतिम टप्प्यातील प्रक्रियेला गती येणार आहे

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’
“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा
पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात