जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर की चावून खाणे अधिक चांगले, जाणून घ्या

जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर की चावून खाणे अधिक चांगले, जाणून घ्या

स्वयंपाकघरात जेवण बनवताना वापरले जाणारे जिरे केवळ जेवणाची चव वाढवतेच असे नाही तर आरोग्यसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. आपल्या आयुर्वेदात पचनसंस्था मजबूत करण्यासाठी, विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जिरे खूप महत्वाचे असल्याचे म्हंटले जाते. त्यामुळे हेच कारण आहे की बरेच लोकं जिरे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या आहारात समाविष्ट करतात. तर काही लोकं जिरे भाजून त्याचे सेवन करतात, तर काहीजण जिऱ्याचे पाणी बनवून पितात.

पण लोकांच्या मनात हा प्रश्न अनेकदा उद्धभवतो की जिरे पाणी पिणे जास्त फायदेशीर आहे की चावून खाणे? तुम्हाला देखील हा संभ्रम दूर करायचे असेल तर आज आपण या लेखात या दोन्ही गोष्टीतून कोणते फायदेशीर आहे ते जाणून घेऊयात?

जिरे चावून खाणे कितपत फायदेशीर?

जिरे भाजून चावून त्याचे सेवन केल्याने तोंडात लाळ तयार होण्याची प्रक्रिया थेट वाढवते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य चांगले होण्यास मदत होते. लाळेमध्ये असलेले एंजाइम अन्नाचे योग्यरित्या पचन करण्यास मदत करते. ज्यामुळे गॅस, अपचन आणि पोटफुगीची समस्या कमी होते. म्हणजेच जिरे चावून खाल्याने तुमची पचनसंस्था मजबूत आणि अधिक सक्रिय राहते. तसेच जिरे चावून खाल्याने तुमचे तोंडाचे आरोग्य चांगले राहते. जिऱ्यामध्ये अँटिमायक्रोबियल गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. याशिवाय जिरे चावल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांच्या संसर्गापासून मुक्तता मिळते. तसेच हिरड्यांमध्ये रक्ताभिसरण देखील सुधारते जे एकूण तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे?

सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी प्यायल्याने पोटात तयार होणाऱ्या आम्लाचे संतुलन राखले जाते, ज्यामुळे गॅस, आम्लता आणि अपचनाची समस्या कमी होते. हे पाचक एंजाइम्सचे स्राव वाढवते, जे आतडे निरोगी ठेवते. जिऱ्याचे पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते, ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते, त्वचा स्वच्छ राहते आणि मूत्रपिंड व्यवस्थित काम करतात. पण जिऱ्याच्या पाण्याचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कोणतेही शरिरीक आजार असल्यास जिऱ्याचे पाणी घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मी दोन्हीपैकी कोणती पद्धत अवलंबावी?

जर तुम्ही पचन आणि तोंडाच्या आरोग्याला प्राधान्य देत असाल तर तुम्ही जिरे चावून खावे. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमचे शरीर डिटॉक्स करायचे असेल, ते हायड्रेटेड ठेवायचे असेल किंवा तुमचे चयापचय वाढवायचे असेल तर जिरे पाणी पिणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;