तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय का? स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय का? स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा

तरुण वयात अनेकांना लक्षात राहत नाही, काही लोक गोष्टी विसरूही लागतात. तुम्हाला माहिती आहे का की हा प्रकार स्मृतिभ्रंशचा असू शकतो. म्हातारपणी स्मरणशक्ती कमी होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु तरुण आणि मध्यम वयात जर तुम्हाला विसर पडत असेल तर त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. याविषयी विस्ताराने जाणून घेऊया.

अनेकदा लोकांना छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याची समस्या असते हे तुमच्या लक्षात आले असेलच. सुरवातीला अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण नंतर यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

‘फॉरगेट फ्लू’ आजार
या आजाराला मानसोपचारतज्ज्ञांच्या भाषेत ‘फॉरगेट फ्लू’ आजार म्हणतात. माणूस सहसा अनेक छोट्या छोट्या गोष्टी विसरून जातो. छोट्या छोट्या गोष्टी विसरण्यापासून त्याची सुरुवात होते, पण, नंतर हळूहळू त्याचं गांभीर्य इतकं वाढत जातं की त्यानंतर तो अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी विसरायला लागतो, ज्यामुळे त्याला नंतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

स्मृतिभ्रंश का होतो?
कधीकधी एखाद्या गोष्टीबद्दल तणाव किंवा चिंता यासारख्या घटकांमुळे होते. या दोन्ही परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा मेंदू नीट काम करणे बंद केल्यास ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागते.

विस्मृतीच्या समस्येवर उपाय काय?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. उदाहरणार्थ, आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. आपण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा वापर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपण अशा रोगांपासून मुक्त होऊ शकाल.

याशिवाय नियमित व्यायाम करा, कारण वर्कआऊट च्या कमतरतेमुळे लोकांमध्ये विस्मृतीची समस्या निर्माण होते हे सहसा दिसून येते, त्यापासून सुटका मिळवण्यासाठी व्यक्तीने आपल्या शारीरिक हालचालींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते.

तणावापासून दूर राहा

टेन्शन आणि स्ट्रेसपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आपली मानसिक स्थिती शिथिल करा, कारण सतत जेव्हा तुमचे मन एखाद्या विशिष्ट कामात गुंतलेले असते, अशा परिस्थितीतही ती व्यक्ती विस्मृतीला बळी पडते. जर खास टिप्स फॉलो केल्या तर हा फार गंभीर आजार नाही. आपल्या काही सवयी सुधारून तुम्ही अशा विस्मरणापासून मुक्त होऊ शकता.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;