हिवाळ्यात दररोज किती बदामाचे करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

हिवाळ्यात दररोज किती बदामाचे करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बदाम फायदेशीर आहे. बदाम उष्ण असतात त्यामुळे लोक हिवाळ्यात जास्त प्रमाणात याचे सेवन करतात. बदामामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ सारखी फॅटी ॲसिड असते, जे हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आहारतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की हिवाळ्यात बदाम खाण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे. तरच आरोग्याला त्याचा फायदा होतो. बदामामध्ये फायटिक ॲसिड असते. त्यामुळे ते खाणे आरोग्याच्या अनेक परिस्थितीमध्ये हानिकारक ठरू शकते. यामुळेच भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरते. पण हिवाळ्यात किती बदाम खावेत हे देखील महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया रोज किती बदाम खाणे योग्य आहे?

हिवाळ्यात दररोज पाच ते दहा बदाम खाणे फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीर उबदार राहते आणि ऊर्जा ही मिळते. असं तज्ञांचा मत आहे यापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढू शकते. त्यामुळे लठ्ठपणा येण्याची शक्यता असते.

बदाम खाण्याची योग्य पद्धत

भिजवून खाणे: बदाम खाण्याच्या सर्वोत्तम मार्ग म्हणजे रात्रभर पाण्यात बदाम भिजवून ठेवून ते खाणे. यामुळे शरीरातील पचन संस्था सुधारते आणि पचनासही मदत होते. बदाम भिजवून खाल्ल्याने त्याचा आरोग्यावर कोणताही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.

सकाळी रिकाम्या पोटी: बदाम खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी सकाळी शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे सकाळी बदाम खाल्ल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते.

बदामाचे दूध: दुधात उकळून बदाम खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराला अतिरिक्त कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात.

बदामा मध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते. जे हृदयासाठी फायदेशीर असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. बदामामध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन ई असते जे त्वचेला आर्द्रता देतात आणि केस निरोगी ठेवतात. हे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;