भारतात मलेरियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी, कारण काय?

भारतात मलेरियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी, कारण काय?

Malaria cases decline in India: आरोग्य क्षेत्रातून एक चांगली बातमी आहे. भारताने मलेरियाचा प्रादुर्भाव आणि या आजारामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यात यश मिळवले आहे. भारतात या आजाराचे प्रमाण 69 टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र, इतक्या झपाट्याने हा आजार कमी कसा झाला, याविषयी जाणून घेऊया.

जागतिक मलेरिया अहवालात बुधवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. अहवालानुसार, भारतात मलेरियाचे रुग्ण 2017 मध्ये 6.4 दशलक्ष होते ते 2023 मध्ये 20 लाखांवर आले आहेत. याच कालावधीत मलेरियाच्या रुग्णांमध्ये सुमारे 70 टक्के घट झाली असून मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 69 टक्के घट झाली आहे. हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. यामध्ये अनेक देशांची आकडेवारी जाहीर केली जाते. भारतात मलेरियाचे रुग्ण कमी होण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत चांगले आहे.

जागतिक मलेरिया कार्यक्रमाचे संचालक डॉ. डॅनियल मदंडी म्हणाले की, मलेरियाचे रुग्ण कमी करण्यासाठी भारताने चांगले काम केले आहे. भारताव्यतिरिक्त लायबेरिया आणि रवांडासारख्या देशांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे.

आजार नियंत्रणात कसा आला?

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या रोग निर्मूलन विभागाचे प्रमुख डॉ. रजनीकांत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टेमिसिनिन आणि लाँग अ‍ॅक्टिंग कीटकनाशक यांच्या कॉम्बिनेशन मेडिसिनमुळे भारतात या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

या थेरपीचा फायदा म्हणजे आर्टेमिसिनिन प्रथम एका प्रथिनेवर हल्ला करून मलेरियाचे जीवाणू नष्ट करते आणि दुसरे औषध उर्वरित जीवाणूनष्ट करते. कॉम्बिनेशन मेडिसिनच्या मदतीने मलेरिया आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येते. या मदतीने या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली आहे.

मलेरियाचा प्रसार कसा होतो?

मलेरिया हा डासांच्या चाव्यामुळे होतो. हा संक्रमित मादी अ‍ॅनोफिल्सद्वारे पसरतो. जेव्हा संक्रमित डास एखाद्या व्यक्तीला चावतो तेव्हा त्याला मलेरिया होतो. मलेरियाच्या चाव्यामुळे ताप, अंगदुखी सारख्या समस्या उद्भवतात.

काही प्रकरणांमध्ये, हे खूप गंभीर देखील असू शकते. गेल्या काही वर्षांपासून भारतात मलेरियाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. आता जागतिक मलेरिया अहवालानेही याला दुजोरा दिला आहे.

मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 69 टक्के घट झाली आहे. यावरुन मलेरियाचा प्रादुर्भाव आणि या आजारामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यात भारताला यश आल्यानं एक प्रकार या आजारापासून दिलासाच मिळाला आहे, असं म्हणता येईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;