हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्याला होणार नाही नुकसान

हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्याला होणार नाही नुकसान

हिवाळा येताच खाण्यापिण्यापासून कपड्यांपर्यंत सर्व काही बदलण्याची गरज असते. थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण त्याचबरोबर जनावरांनाही थंडीपासून वाचवणं गरजेचं आहे. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात कुत्रे किंवा मांजर असे पाळीव प्राणी असतात. घरात असलेल्या त्या प्राण्याची काळजी घेणे ही देखील आपली जबाबदारी आहे. कारण थंडीमुळे त्यांच्या शारीरिक स्थितीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

तुमच्या घरात कुत्रे किंवा मांजरीसारखे पाळीव प्राणी असतील तर या वेळी त्यांची काळजी घ्यावी. पण थंडीचा परिणाम त्यांच्या शरीरावरही पडतो. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या जनावराची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

जागेची काळजी घ्या

थंडीपासून बचाव करण्यासाठी पाळीव प्राण्यांसाठी उबदार आणि आरामदायक जागा निवडा. विशेषत: रात्री जेव्हा थंडी असते. त्यांना अशा ठिकाणी ठेवा जिथे ते थंडीपासून सुरक्षित राहतील. यासोबतच तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या जागेवर ब्लँकेट किंवा उबदार चादर ठेवू शकता.

स्वेटर आणि जॅकेट

तुमच्या कडील कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांना कपडे घालू शकता. या पाळीव प्राण्यांना स्वेटर आणि जॅकेटसारखे उबदार कपडे आपल्याला बाजारात किंवा ऑनलाइन सहज मिळतात. विशेषत: जेव्हा तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जात तेव्हा त्यांना कपडे घाला. यामुळे त्यांच्या त्वचेचे आणि शरीराचे थंडीपासून बचाव होईल.

जमिनीवर झोपू देऊ नका

हिवाळ्यात आपल्या घराची फरशी थंड असते, म्हणून पाळीव प्राण्यांना थंड जमिनीवर झोपण्यापासून प्रतिबंधित करा, कारण यामुळे त्यांचे सांधे आणि हाडे खराब होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटा सा पलंग ठेवा किवा त्यांचा झोपण्याच्या ठिकणी चादर ब्लँकेट वेगळा ठेवा. त्यांचा पलंग नेहमी उंचीवर ठेवा जेणेकरून ते थंडीपासून वाचू शकतील.

मॉइश्चरायझिंग आणि साफसफाई

पाळीव प्राण्यांची त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यांचे विशेष मॉइश्चरायझर वापरू शकता. तुम्हाला हे पाळीव प्राण्यांच्या पेट शॉप व स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन सहज सापडेल. त्याचबरोबर त्यांच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. त्यांचे कपडे आणि पलंग स्वच्छ ठेवा. पाळीव प्राण्यांना हिवाळ्यात आंघोळीची फारशी गरज नसते, पण ते घाण झाले तर त्यांना अंघोळ घालावी लागते. तुम्ही 2 ते 3 दिवसांनंतर त्यांना अंघोळ घालण्याची वेळ सेट करू शकता. यासाठी जास्त गरम किंवा थंड पाण्याचा वापर करू नये.

पाळीव प्राण्यांना हिवाळ्यात पुरेसे पाणी पिण्यास प्रोत्साहित करा, कारण थंड हवामानात ते कमी पाणी पिऊ शकतात. तसेच बदलत्या ऋतूनुसार त्यांना खाऊ घालावे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;