पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत लढविन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण

पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत लढविन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण

धाराशिव – मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फटका लोकसभा निवडणूकांत भाजपाला मराठवाड्यात सर्वाधिक बसला. या ठिकाणी भाजपाचे तगडे उमेदवार असलेले माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पडले. जालनातून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाले आणि याच ठिकाणी भाजपाला सर्वात मोठा हादरा बसला. तसेच बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपण राज्यसभा मागणार नाही, विधानपरिषद मागणार नाही, विधानसभा लढविणार नाही. मात्र पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असे स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर भाजपाचे महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचे आयोजन सुरु आहे. याच अनुषंगाने माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की मला पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायतची निवडणूक देखील लढून काम करेन असे ते स्पष्ट म्हणाले.

अब्दुल सत्तार कोणत्या दिशेला उभे राहतात त्यावर..

अब्दुल सत्तार नेमकं कोणत्या दिशेने तोंड करून उभे राहतात त्यावर त्यांना विधानसभेला निवडून आणायचे की पाडायचे ? हे ठरवणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. मी नेहमीप्रमाणे पूर्वेला देवदर्शनासाठी उभा राहतो आणि देवदर्शन घेतो. ते नेहमी पश्चिमेला तोंड करून उभे राहतात ते जर पूर्वेला आमच्या बाजूला तोंड करून उभे राहिले. तर मला आदेश आला तर मी त्यांचा प्रचार करेन. ते जर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले तर विरोधात प्रचार करेल. मात्र ते कोणती भूमिका घेतात यावर मी ठरवणार असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात पिठात किडे होण्यामुळे वैतागला आहात? पिठात ही गोष्ट ठेवा,  काही मिनिटांतच समस्या सुटेल पावसाळ्यात पिठात किडे होण्यामुळे वैतागला आहात? पिठात ही गोष्ट ठेवा, काही मिनिटांतच समस्या सुटेल
पावसाळ्यात शक्यतो कोणत्याही पिठात किडे होण्याची समस्या समोर येतेच. किड्यांचं प्रमाण पिठात एवढ वाढतं कि ते पीठ शेवटी फेकून देण्याव्यतिरिक्त...
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक
स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा, एक कोटीची रोकड आणि 20 किलो सोने लुटून दरोडेखोर पसार
IND W Vs AUS W – गोलंदाजांची कमाल; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला, मालिका बरोबरीत
Asia Cup 2025 – सूर्यकुमार यादवला फाईन लावा, मॅच रेफरीवर कारवाई करा…; पाकिस्तानच्या मागण्यांना ICC ची केराची टोपली
वर्गात गैरवर्तन केले म्हणून शिक्षिकेने डोक्यात स्टीलचा डबा मारला, विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर
चंद्रपूर मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले