Ram Mandir | अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? कुणी बिघडवला खेळ? अखेर सत्य समोर आले

Ram Mandir | अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? कुणी बिघडवला खेळ? अखेर सत्य समोर आले

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघाची चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे अयोध्या आणि राम मंदिर याच मतदार संघात येत आहे. या मतदार भाजपचा झालेल्या पराभवाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. मात्र, अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे कारण अखेर समोर आले आहे. येथे झालेल्या पराभवाचा पक्षाने आढावा घेतला. या आढावा अहवालातून एक मोठे कारण समोर आले आहे. रामनगरीतील पराभवाचे कारण फैजाबादमधील भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार लल्लू सिंह यांचे वक्तव्य आहे. त्यामुळेच पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये भाजपच्या बहुमतापासून दूर राहण्यापेक्षा फैजाबाद जागेवरील पक्षाच्या पराभवाची अधिक चर्चा झाली. रामनगरीत पराभवामागे फैजाबादमधील भाजप उमेदवार आणि माजी खासदार लल्लू सिंह यांच्या वक्तव्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. लल्लू सिंह यांनी संविधान बदलण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे दलित मते भाजपकडून गमावली गेल्याचे अहवालात म्हटले आहे.

लल्लू सिंह यांनी भाजपच्या 400 पार करण्याच्या नाऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना घटना दुरुस्तीबाबत एक विधान केले. त्यांचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ते ‘272 चे सरकार बनते. पण 272 चे सरकार संविधानात दुरुस्ती करू शकत नाही. नवीन संविधान बनविण्यासाठी दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आवश्यक आहे. त्यांच्या या विधानामुळे कुर्मी आणि मौर्य मतांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी भाजप विरोधात मतदान केले.

भाजपच्या पुनरावलोकन अहवालात लल्लू सिंह यांचे हे विधान पक्षासाठी घातक मानले गेले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप दलित मतदारांमधील आरक्षण रद्द करत असल्याच्या विरोधी पक्षांच्या दाव्याला बळ मिळाले असे म्हटले आहे. यासोबतच पेपरफुटीसारखे मुद्देही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात आले. उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये पेपरफुटी ही मोठी समस्या म्हणून समोर आली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा 2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा
गूगलचे माजी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध भविष्यवक्ता रे कुर्जवील यांनी सनसनाटी दावा केला आहे. 2030 पर्यंत नैनोरोबोट्सच्या मदतीने माणूस अमर होईल,...
छगन भुजबळ मंगळवारी घेणार मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खात्याची मिळणार जबाबदारी?
IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने केला पराभव
‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा