इतका द्वेष केल्याबद्दल धन्यवाद म्हणत ‘अनुपमा’मधील अभिनेत्याने सोडली मालिका
'अनुपमा' ही स्टार प्लस वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमी अग्रस्थानी असते. गेल्या काही काळात या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला, तर काही नव्या कलाकारांची यामध्ये एण्ट्री झाली. आता मालिकेत चार वर्षे काम केल्यानंतर आणखी एका अभिनेत्याने एग्झिटचा निर्णय घेतला आहे.
मालिकेत अनुपमाचा मुलगा तोषुची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष मेहरोत्रा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आशिषने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.
'हा अत्यंत सुंदर प्रवास होता. अनुपमामध्ये तोषुच्या रुपात जवळपास चार वर्षांचा सुंदर प्रवास.. एक व्यक्ती म्हणून मी जसा आहे, त्याच्या अगदी विरोधात जाऊन भूमिका साकारणं खूप आव्हानात्मक होतं. पण हे काम करताना मला खूप मजा आली', असं त्याने लिहिलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List