पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याने मुंबईत मुख्याध्यापिकेला कामावरून काढले

पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याने मुंबईत मुख्याध्यापिकेला कामावरून काढले

पॅलेस्टाईन समर्थनार्थ पोस्टवर मत प्रदर्शन केल्याने सोमय्या विद्याविहार शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांना मुख्याध्यापक पदावरून काढून टाकण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. तसेच ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा शेख यांनी दिला आहे. मागील 12 वर्षांपासून परवीन शेख या सोमय्यामध्ये कार्यरत आहेत. सात वर्षांपूर्वी त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम सुरू केले. संस्थेने केलेल्या कारवाईविरोधात बोलताना त्यांनी सांगितले, आतापर्यंतच्या कार्यकाळात शाळेच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रामाणिक योगदान दिले आहे. त्यामुळे संस्थेने माझ्या मागे उभे राहणे गरजेचे होते. मात्र माझ्याविरोधात राजकीय सूडबुद्धीने अपमानकारक कारवाई करण्यात आली. शेख यांचे लेखी म्हणणे ऐकून घेतल्यानंतरही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आमची संस्था ही 80 वर्षांहून अधिक वर्षांपासून शिक्षणाचा वारसा चालवते. संस्थेचे काही मूल्ये आणि वचनबद्धतता ठरली असून त्याला शेख यांनी सोशल मीडियावर केलेल्या प्रतिसादामुळे तडा गेल्याने आम्हाला त्यांच्यावर ही कारवाई करावी लागल्याचे संस्थेने म्हटले आहे.

कायदेशीर लढाई लढणार

संस्थांकडून सेवा समाप्तीची नोटीस मिळण्यापूर्वीच सोशल मीडियावरून मला शाळेतून काढून टाकल्याची बातमी मिळाली. हे ऐकून मला धक्काच बसला. ही नोटीस बेकायदेशीर आहे. ही कृती राजकीय हेतूने प्रेरित आहे. माझा आपल्या कायदेशीर व्यवस्थेवर आणि देशाच्या संविधानावर ठाम विश्वास आहे. सध्या मी कायदेशीर पर्यायांचा विचार करत करतेय, असे शेख म्हणाल्या.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. देशभरात 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे....
गॅस रिफिलिंग करताना कंटेनरचा भीषण स्फोट 4 कंटेनर जळून खाक; 15 घरांचे नुकसान
75 वर्षीय आजोबांना हायकोर्टाचा दिलासा; तीन मुलांना झोपड्यातून आठ आठवड्यात बाहेर जाण्याचे आदेश
राज्यातून भाजप, मित्रमंडळींचा सुपडा साफ होणार! – नाना पटोले
84 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात
आचारसंहितेची ऐशी की तैशी; मतदानाच्या आदल्या दिवशीही भाजपकडून प्रचार, आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी
शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 124 संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त