रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, ‘तारख मेहता का उल्टा चश्मा’मधील लोकप्रिय अभिनेता कुठे गेला?

रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, ‘तारख मेहता का उल्टा चश्मा’मधील लोकप्रिय अभिनेता कुठे गेला?

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी हा देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन सिंह सोढी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुजवणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एवढा लोकप्रिय अभिनेता नेमका गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित होतोय. गुरुचरण यांचा शोध पोलीसही घेत आहेत. पण त्यांचा तपास अजून लागलेला नाही. गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. गुरुचरण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. गुरुचरण यांचा लवकर शोध लागावा यासाठी अनेकांकडून प्रार्थना केली जात आहे.

गुरुचरण 22 एप्रिलला दिल्ली विमानतळावर शेवटचे दिसले होते. दिल्ली विमानतळावरुन ते मुंबईला येणार होते. पण ते मुंबईला पोहोचलेच नाहीत. याशिवाय ते तेव्हापासून घरीदेखील पोहोचले नाहीत. गुरुचरण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “माझा मुलगा गरुचरण सिंह, ज्याचं वय 50 वर्ष आहे, तो 22 एप्रिलच्या सकाळी 8.30 वाजता मुंबई विमानतळाच्या दिशेला निघाला होता. पण तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरीदेखील परतला नाही. त्याच्याशी फोनवरही संपर्क होऊ शकलेला नाही. त्याची मानसिक अवस्था चांगली आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. पण तो बेपत्ता आहे.”

2013 मध्ये मालिका सोडलेली, पण…

गुरुचरण सिंह यांनी ‘तारख मेहता का उल्टा चश्मा” या टीव्ही मालिकेत रोशन सिंह सोढी नावाची भूमिका साकारली होती. रोशन सिंह सोढी हा नेहमी पार्टी करण्याच्या मूडमध्ये असायचा. तसचे तो कधीच आपल्या पत्नीसोबतचं प्रेम व्यक्त करण्यात मागे असायचा नाही. तो मालिकेतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय भूमिकांपैकी एक होता. पण गुरुचरण सिंह यांनी 2013 मध्ये मालिका सोडली होती. पुढे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ते पुन्हा मालिकेत आले होते. त्यानंतर त्यांनी 2020 मध्ये मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याऐवजी अभिनेता बलविंदर सिंह यांना कास्ट करण्यात आलं होतं.

2020 मध्ये पुन्हा मालिका सोडली, कारण काय?

गुरुचरण सिंह यांनी इटाईम्सला 2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत मालिका का सोडली? यामागील ओझरतं कारण सांगितलं होतं. मी जेव्हा मालिका सोडली तेव्हा माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया होणार होती. काही गोष्टी होत्या, ज्याबद्दल बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया गुरुचरण सिंह यांनी दिली होती. विशेष म्हणजे याबाबत लोकांमध्ये वेगळी चर्चा सुरु होती. गुरुचरण सिंह यांना उशिराने कामाचे पेमेंट मिळत असल्याने त्यांनी मालिका सोडल्याची चर्चा होती. पण गुरुचरण यांनी त्याबाबत कधीच भाष्य केलं नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने.. ‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
नुकताच एक अत्यंत हैराण करणारी बातमी पुढे येताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. प्रसिद्ध दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफरचे निधन झाले...
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन
आंबेगाव तालुक्यातील डिंभे कालव्यावरचा पूल कोसळला
4 जूनला जनताच तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल! उद्धव ठाकरे मिंध्यांवर कडाडले
मोदीजी एक काम करा, सीबीआय ईडीला अदानी अंबानींकडे पाठवा; राहुल गांधी यांचा मास्टरस्ट्रोक