गेल्या महिनाभरात राहुल गांधींनी 103 वेळा अदानी आणि 30 वेळा अंबानींचे नाव घेतले, काँग्रेसचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका सभेत बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसने अदानी व अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप मोदींनी केला आहे. हा आरोप करताना मोदी म्हणाले की निवडणूक येताचा राजकुमारांनी अदानी व अंबानींचं नाव घेणं बंद केलं आहे. त्यावरून आता काँग्रेसने आता पलटवार केला आहे.
निवडणुकीच्या तीन टप्प्यांनंतर नरेंद्र मोदी इतके चिडले की ते अदानी-अंबानींच्या विरोधात बोलू लागले.
पीएम मोदी म्हणाले- राहुल गांधी जी अदानी-अंबानींचे नाव घेत नाहीत.
सत्य हे आहे..3 एप्रिलपासून आतापर्यंत राहुल गांधींनी 103 वेळा अदानी आणि 30 वेळा अंबानींचे नाव घेतले आहे.… pic.twitter.com/i4XAdz6phf
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 8, 2024
”निवडणुकीच्या तीन टप्प्यांनंतर नरेंद्र मोदी इतके चिडले की ते आता अदानी-अंबानींच्या विरोधात बोलू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले- राहुल गांधी अदानी-अंबानींचे नाव घेत नाहीत. सत्य हे आहे 3 एप्रिलपासून आतापर्यंत राहुल गांधींनी 103 वेळा अदानी आणि 30 वेळा अंबानींचे नाव घेतले आहे, असे काँग्रेसने स्पष्ट करत मोदींवर पलटवार केला आहे.
भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचा ड्रायव्हर कोण? राहुल गांधींचा मोंदींवर हल्लाबोल #Rahulgandhi #NarendraModi #LokSabhaElection2024 pic.twitter.com/8SMlErPFIi
— Saamana (@SaamanaOnline) May 8, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List