BLOG : बारामतीच्या कुरुक्षेत्रावर अजित पवार अर्जुन ठरणार की, त्यांचा अभिमन्यू होणार?

BLOG : बारामतीच्या कुरुक्षेत्रावर अजित पवार अर्जुन ठरणार की, त्यांचा अभिमन्यू होणार?

महाभारतात भाऊच भावांविरुद्ध लढले होते. महाभारताच वैशिष्ट्य म्हणजे त्यात धर्मा बरोबर अधर्म, निती सोबत अनिती, निस्वार्थी भावनेसोबत स्वार्थी उद्देश, छळ, कपट, नैतिकता या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी महाभारताइतका उत्तम शिक्षक नाही. महाभारतातून बरच काही शिकण्यासारख आहे. महाभारताच सार बरच काही शिकवून जातं. आयुष्यात यश-अपयश पचवण्यासाठी महाभारत समजून घेतलं पाहिजे. महाभारतातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे कुरुक्षेत्रावर अर्जुनाची झालेली अवस्था. अंतिम युद्धाच्यावेळी समोर सगळे आपलेच होते. ज्यांनी शिकवलं-घडवलं, त्यांच्यावरच बाण चालवायचे होते. संवेदनशील मनाच्या अर्जुनाला आपल्याच माणसांना मारणं पटत नव्हतं. अर्जुनाच मन धनुष्य उचलायला धजावत नव्हतं, त्यावेळी त्याच्या रथाच सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने त्याला धर्म-अधर्मामधला फरक समजावून युद्धा लढण्यासाठी तयार केलं, त्यानंतर घडलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे.

महाभारतातल्या या घटना अनेकदा आपल्या व्यक्तीगत आयुष्यात सुद्धा घडतात. समोर आपलेच असतात. विषय फक्त वेगळे असतात. संपत्ती, पैसा, वर्चस्व, मान-सन्मान आणि राजकारण अशा विषयांवर संघर्ष असतो. राजकारणात बऱ्याचदा वारसा, वर्चस्वाच्या लढाईत आपसात यादवी होते. त्यावेळी सगळ्या नात्या-गोत्यांचा, आठवणींचा विसर पडतो. समोर दिसत असतो तो फक्त विजय, प्रतिष्ठा, वर्चस्व. ज्यांचा हात पकडून आपण राजकारणात आलोय, त्यांच्यामुळे ओळख मिळाली, नाव मिळालं, आपलं अस्तित्व निर्माण झालं, याचा सुद्धा विसर पडतो. डोळ्यासमोर, डोक्यात असतो, तो फक्त ‘मी आणि मी’ च.

मतदार राजा ठरवणार कोणाची बाजू नितीची

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी स्थिती आहे. काका-पुतणे आमने-सामने आहेत. पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. सगळ्या महाराष्ट्राच लक्ष या राजकीय लढाईकडे लागलं आहे. या लढाईच कुरुक्षेत्र बारामती असलं, तरी सामना अख्ख्या महाराष्ट्रात आहे. दोन्ही बाजूंसाठी लढाई अस्तित्वाची आहे. धर्म-अर्धम, नैतिकता-अनैतिकतेच्या या लढाई मतदार राजा कोणाची बाजू नितीची ते ठरवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी भविष्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे. सुप्रिया ताई की, दादा? ते आता मतदारच ठरवतील.

अर्जुन ठरणार की अभिमन्यू

लढाई प्रतिष्ठेपेक्षा पण स्वतंत्र अस्तित्वाची असल्याने सर्वच योद्धे त्वेषाने, प्राणपणाने लढतील यात शंका नाही. या लढाईत अजित पवारांसमोर सुद्धा आपलेच आहेत. स्वत: अजित पवारांचा सख्खा भाऊ, पुतणे, भाचे सगळे मिळून अजित पवारांविरोधात प्रचार करतायत. अजित पवार आपलं सर्व कौशल्य पणाला लावतील यात अजिबात शंका नाही. आपल्या माणसांचे वार झेलून अजित पवारांना मतदार राजाला आपली बाजू पटवून द्यायची आहे. या लढाईत ते अर्जुन ठरणार की अभिमन्यू याचा फैसला 4 जूनला होईल.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था