Sharad Pawar : मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान उमेदवाराबद्दल भाष्य

Sharad Pawar : मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान उमेदवाराबद्दल भाष्य

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी असा सामना आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन झालीय. सुरुवातीला इंडिया आघाडीत अनेक पक्ष होते. पण निवडणुका जवळ आल्यानंतर जनता दल युनायटेड आणि तृणमुल काँग्रेस सारखे मोठे पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडले. राजकीय हवा बदलल्यानंतर हे पक्ष इंडिया आघाडीत पुन्हा सामील होऊ शकतात. सध्या पंतप्रधान मोदींना अश्वमेध रोखणं हेच इंडिया आघाडीसमोरच लक्ष्य आहे. NDA आघाडीकडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. इंडिया आघाडीमध्ये मात्र पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला नाही. इंडियन एक्सप्रेसला त्यांनी मुलाखत दिली.

इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा होते. काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पंतप्रधानपदाठी पुढे आलेलं. त्यानंतर ही चर्चा थांबली. आता इंडिया आघाडीत असलेले दिग्गज नेते शरद पवार यांनी प्रथमच पंतप्रधानपदाबद्दल अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, “1977 च्या जवळपास जाणारी स्थिती आहे. त्यावेळी जनता पार्टी स्थापन झालेली. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेस विरोधी पक्ष एकत्र आले होते व त्यांनी जनता पार्टीची स्थापना केलेली पुढे त्यांनी देशात सरकारही बनवलं” त्यावेळी सुद्धा आतासारखच पंतप्रधानपदाचा उमेदवार विरोधी पक्षांनी ठरवलेला नव्हता. जनता पार्टीमध्ये विलीन झालेल्या विविध पक्षीय खासदारांशी बोलल्यानंतर जयप्रकाश नारायण आणि जेबी क्रिपालानी यांनी मोरारजी देसाई यांचं नाव पंतप्रधान म्हणून जाहीर केलं होतं.

इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबद्दल शरद पवार काय बोलले?

“1977 साली मोरारजी देसाई यांना जी मान्यता होती, त्यापेक्षा आज राहुल गांधी यांची स्वीकृती जास्त आहे” असं शरद पवार म्हणाले. ठस्वत:च्या पक्षात त्यांना भक्कम समर्थन आहे. आम्हा प्रादेशिक पक्षासोबत राहुल गांधींनी चांगला संवाद ठेवलाय” असही पवार म्हणाले. राहुल गांधींनी मला कॉल केला होता, तेव्हा अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आम्ही गंभीर चर्चा केल्याच शरद पवार म्हणाले. मोरारजी देसाई यांची अशी कार्यपद्धती नव्हती असं पवार म्हणाले. शरद पवार यांनी राहुल गांधींच भरभरुन कौतुक केलय. पंतप्रधानपदाचे दाखले देऊन अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच समर्थन केलय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;